शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

बातम्यांच्या दुनियेत सरकारी दूरदर्शनच अव्वल, खासगी वाहिन्या पिछाडीवर

By admin | Updated: February 20, 2016 10:31 IST

संध्याकाळी साडेसातच्या बातम्यांच्या लोकप्रियतेच्या बाबतीत खासगी वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत मुंबई दूरदर्शन खूपच आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - संध्याकाळी साडेसातच्या बातम्यांच्या लोकप्रियतेच्या बाबतीत खासगी वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत मुंबई दूरदर्शन खूपच आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नव्या बदलांमध्ये सह्याद्री वाहिनीवरच्या बातम्या अजूनही लोकप्रिय आहेत का? असा प्रश्न तुमच्या मनात डोकावला असेल तर हे त्याचं उत्तर हो असं आहे.
Broadcast Audience Research Council या स्वतंत्र संस्थेकडून दर आठवड्याची टेलीविजन माध्यमाची प्रेक्षकांची आकडेवारी प्रसिद्ध होत असते. त्यानुसार जर डिसेंबर २०१५ चा शेवटचा आठवडा बघितला तर दूरदर्शनवरच्या सायंकाळी सातच्या बातम्या जेव्हा ४७ लाखांहून अधिक घरांत पहिल्या गेल्या. त्याचवेळी मी मराठी, एबीपी माझा, झी २४ तास, आय बी एन लोकमत आणि जय महाराष्ट्र या पाचही वाहिन्या एकत्र केल्या तरी त्यांची एकत्रित आकडेवारी होती अवघी २५ लाख, म्हणजे एकट्या दूरदर्शनच्या साधारण निम्मीच! दूरदर्शन लोकप्रियतेमध्ये पहिल्या क्रमांकावर असताना, दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासची प्रेक्षक संख्या सह्याद्रीच्या एक पंचमांश एवढीच होती. कोणत्याही आठवड्याची आकडेवारी पहिली तरी सह्याद्री वाहिनीच्या बातम्या अव्वलच आहेत, आणि प्रेक्षक संख्येत अन्य वृत्त वाहिन्यांपेक्षा खूपच आघाडीवर आहेत. 
रात्रौ साडेनऊच्या सह्याद्रीच्या बातम्याही लोकप्रियतेमध्ये अव्वलच असल्याचं आढळलं आहे. अनेक पाहुण्यांना बोलावून त्यांच्यात भांडणं लावायची आणि आपण मजा बघायची ही नव्या खासगी वाहिन्यांची स्टाइल प्रेक्षकांना भावली नसल्याची मार्मिक टिप्पणी एका दूरदर्शनप्रेमीने केली आहे. 
चर्चेचं अखंड गुऱ्हाळ चालवून कुणालाच आपली भूमिका मांडू न देणं, त्यातही वृत्त निवेदाकानेच स्वत:च अखंड बोलत राहणं हे प्रेक्षकांना फारसं रुचत नसावं असंही मत व्यक्त करण्यात आलं आहे. त्यापेक्षा सह्याद्री वाहिनीवर रात्रौ साडेनऊच्या बातमीपत्रात एकाच पाहुण्याला आमंत्रित करून, त्याला सन्मानाने आपली मतं मांडायची पूर्ण मुभा असणं प्रेक्षकांना आवडत असावं, असा या आकडेवारीचा निष्कर्ष असावा.
'विश्वासार्हता' हा सह्याद्री वाहिनीवरच्या बातम्यांचा प्राण आहे, असं सह्याद्रीमध्ये काम करणारे सांगतात आणि बातमी एक वेळ उशीरा देऊ, पण खात्री करूनच देऊ हा इथला मूलमंत्र असल्याचं ठासून सांगतात.
बदलत्या कालानुरूप वेगाने न बदलता जुन्या पठडीनुसार बातम्या देत राहणं ही सह्याद्री वाहिनीवरील बातम्यांची चूक वाटत होती, पण नेमका तोच शहाणपणा ठरलाय! प्रेक्षक संख्येची आकडेवारी तरी हेच सांगतेय, असं मतही या क्षेत्रातल्या एकानं व्यक्त केलं आहे.