शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घोषणा! महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण; ना महायुती, ना मविआ, विधानसभेला तिसरा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:01 IST

येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.

मुंबई - महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या  २ बाजू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला पर्याय म्हणून आम्ही पुढे येत आहोत. सामान्य व्यक्तीला त्यांच्या हक्काचं बटण देण्याचं काम आम्ही करणार आहोत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे असं सांगत महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. 

मुंबईत छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या ७५ वर्षात  नुसत हेवदावे सुरू आहे. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील १५-२० दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबतही आमची बोलणी सुरू आहेत. काही मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी आणखी २ बैठका घ्याव्या लागतील.  बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर आमच्यासोबत आलेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे जायचे आहे. जय जवान, जय किसान पक्ष आमच्यासोबत आला आहे. ही चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींसोबत आमचे बोलणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सगळे घटक कसे येतील, वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली. आपल्याला पाडायचं नाही तर निवडून कसं आणता येईल यावर बोलणं झालं. त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे. गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. जरांगे सकारात्मक निर्णय घेतील ही अपेक्षा आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. 

दरम्यान, निवडणूक लांबल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत अशी माहिती संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत दिली. 

अनुसूचित जातीतील लोक अन् मुस्लिमांची फसवणूक

आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण ५ वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे. लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही. अनुसूचित जातीतील, मुस्लीम समाजाला आज त्यांची फसवणूक झालीय असं वाटायला लागलं आहे. महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणि मविआ हटवायचे असेल तर महायुती आणा हा जो खेळ सुरू आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक पर्याय म्हणून नवीन समीकरण पुढे येत आहे असं विधान राजरत्न आंबेडकरांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raju Shettyराजू शेट्टीBacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील