शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

कर्जमाफी न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांना नवे कर्ज; कापूस खरेदी चौपटीने करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 06:17 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

मुंबई : राज्यात अद्याप महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांनादेखील खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज देण्यात येणार आहे. तसेच कापूस खरेदीचा वेग चौपटीने वाढविण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.कर्जमुक्ती योजनेसाठी ३० लाख लाभार्थी शेतकºयांची यादी सहकार विभागाने निश्चित केली होती. मार्चपर्यंत त्यातील १९ लाख शेतकºयांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ११ लाख १२ हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत. लॉकडाउनमुळे सरकारी यंत्रणा जवळपास ठप्प झाली आहे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीच्या खर्चाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ८ हजार १०० कोटी रुपयांची कर्जमाफी देता आली नाही. ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना थकबाकीदार म्हणून गृहीत न धरता नव्या कर्जाचा लाभ देण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. खरीप हंगामासाठी ४४ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यात बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. प्रयोगशील शेतकºयांची रिसोर्स बँक केली असून शेतकरी शास्त्रज्ञ मंच देखील स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.‘अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिके घ्या’कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले. पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनामुळे शेतीबरोबरच अन्य कुठल्या क्षेत्रात आव्हाने आहेत यावर चर्चा करण्यासाठी सविस्तर बैठक लवकर घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दररोज दोन लाख क्विंटल कापूस खरेदी करा - अजित पवारकापूस, मका, तूर,हरभरा, ज्वारी, धानाची खरेदी वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. ही खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात दिले होते. कापसाची खरेदी कोणत्याही परिस्थितीत २० जूनपर्यंत संपायला हवी. दररोज दोन लाख क्विंटल कापूस खरेदी करा, असे पवार यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढूशकेल, असे ते म्हणाले .

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीcottonकापूस