शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या धोरणासाठी पुन्हा नवी समिती ! आमदारांच्या २३ वर्षांपूर्वीच्या समितीचा अहवाल बासनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:41 IST

Onion Policy: कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक, निर्यातीबाबत धोरण ठरविण्यासाठी २३ वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा तदर्थ समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारने १२ जून रोजी कांदा धोरण ठरविण्यासाठी पुन्हा नवी समिती नेमली आहे.

- योगेश बिडवई मुंबई - कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक, निर्यातीबाबत धोरण ठरविण्यासाठी २३ वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा तदर्थ समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारने १२ जून रोजी कांदा धोरण ठरविण्यासाठी पुन्हा नवी समिती नेमली आहे.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कांदा धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविण्यासंदर्भात समिती गठित करण्यात आली आहे. त्यात २० सदस्य असतील. कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असूनही धोरणात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे किंमत स्थिरीकरण, साठवणूक विस्तार, निर्यात प्रोत्साहन, बाजार सुधारणा आदींबाबत उपाय सुचविण्यासाठी ही समिती नेमली आहे. यात पणन विभागातील बहुतांश अधिकाऱ्यांचाच भरणा आहे.

सहा महिन्यांचा कार्यकाळ आमदारांच्या समितीप्रमाणेच पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कार्य समितीची कक्षा आहे. पुरवठा साखळी, कांदा साठवणूक, किंमत स्थिरता, लागवड पद्धती, आयात-निर्यात धोरणाचा अभ्यास समिती करणार आहे. शेतकरी, व्यापारी, धोरणकर्ते व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी ते संवाद साधतील. समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल. सहा महिन्यांत अंतिम अहवाल व धोरणाचा मसुदा सादर करावा लागेल. 

... तेव्हा कांदा तदर्थ समितीतत्कालीन परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे व इतर सदस्यांनी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत १८ डिसेंबर २००२ रोजी कांदा प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडली होती. तत्कालीन पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवेदन केले. सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. 

आमदारांच्या समितीच्या सूचनांचे काय झाले?समितीने कांद्याची साठवण, पीकरचना, प्रतवारी, प्रक्रिया उद्योग, निर्यात क्षेत्र आदींबाबतचा अंतरिम अहवाल तयार करून विधानसभा सभागृहात २५ जुलै २००३ रोजी सादर केला. कांद्याची रेल्वे वॅगन्सने वाहतूक, वॅगनचे दर कमी करणे, निर्यात धोरण, प्रोत्साहन, कांदा उत्पादकांच्या संस्था कार्यक्षम करणे, हमीभाव देणे, संशोधन व विकास निधी, तसेच पाण्याची उपलब्धता, चाळींसाठी अनुदान आदींबाबत शिफारसी केल्या होत्या. समितीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, रेल भवन व उद्योग भवन, नवी दिल्ली येथे, तसेच विधान भवनात दोन बैठका झाल्या होत्या. त्याचा सविस्तर अहवाल दिला होता. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.

टॅग्स :onionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार