शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

कांद्याच्या धोरणासाठी पुन्हा नवी समिती ! आमदारांच्या २३ वर्षांपूर्वीच्या समितीचा अहवाल बासनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:41 IST

Onion Policy: कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक, निर्यातीबाबत धोरण ठरविण्यासाठी २३ वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा तदर्थ समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारने १२ जून रोजी कांदा धोरण ठरविण्यासाठी पुन्हा नवी समिती नेमली आहे.

- योगेश बिडवई मुंबई - कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक, निर्यातीबाबत धोरण ठरविण्यासाठी २३ वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा तदर्थ समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारने १२ जून रोजी कांदा धोरण ठरविण्यासाठी पुन्हा नवी समिती नेमली आहे.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कांदा धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविण्यासंदर्भात समिती गठित करण्यात आली आहे. त्यात २० सदस्य असतील. कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असूनही धोरणात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे किंमत स्थिरीकरण, साठवणूक विस्तार, निर्यात प्रोत्साहन, बाजार सुधारणा आदींबाबत उपाय सुचविण्यासाठी ही समिती नेमली आहे. यात पणन विभागातील बहुतांश अधिकाऱ्यांचाच भरणा आहे.

सहा महिन्यांचा कार्यकाळ आमदारांच्या समितीप्रमाणेच पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कार्य समितीची कक्षा आहे. पुरवठा साखळी, कांदा साठवणूक, किंमत स्थिरता, लागवड पद्धती, आयात-निर्यात धोरणाचा अभ्यास समिती करणार आहे. शेतकरी, व्यापारी, धोरणकर्ते व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी ते संवाद साधतील. समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल. सहा महिन्यांत अंतिम अहवाल व धोरणाचा मसुदा सादर करावा लागेल. 

... तेव्हा कांदा तदर्थ समितीतत्कालीन परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे व इतर सदस्यांनी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत १८ डिसेंबर २००२ रोजी कांदा प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडली होती. तत्कालीन पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवेदन केले. सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. 

आमदारांच्या समितीच्या सूचनांचे काय झाले?समितीने कांद्याची साठवण, पीकरचना, प्रतवारी, प्रक्रिया उद्योग, निर्यात क्षेत्र आदींबाबतचा अंतरिम अहवाल तयार करून विधानसभा सभागृहात २५ जुलै २००३ रोजी सादर केला. कांद्याची रेल्वे वॅगन्सने वाहतूक, वॅगनचे दर कमी करणे, निर्यात धोरण, प्रोत्साहन, कांदा उत्पादकांच्या संस्था कार्यक्षम करणे, हमीभाव देणे, संशोधन व विकास निधी, तसेच पाण्याची उपलब्धता, चाळींसाठी अनुदान आदींबाबत शिफारसी केल्या होत्या. समितीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, रेल भवन व उद्योग भवन, नवी दिल्ली येथे, तसेच विधान भवनात दोन बैठका झाल्या होत्या. त्याचा सविस्तर अहवाल दिला होता. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.

टॅग्स :onionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार