शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नवी कोरी पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 4:27 AM

बालभारती : राज्यभरातील शाळांना आतापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा

मुंबई : राज्यातल्या अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत. राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीने तब्बल ६ कोटी ३ लाख ७९ हजार ६९१ पुस्तकांचा पुरवठा सर्व जिल्ह्यांतील शाळांना केला आहे. त्यामुळे राज्यातील मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या अनुदानित शाळांना आत्तापर्यंत ९८.४० टक्के पुस्तकांचा पुरवठा पूर्ण झाला आहे.

ग्रेटर मुंबई, पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबईत मिळून यंदा ३८ लाख १० हजार ६५१ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३७ लाख ६९ हजार ६०८ पुस्तकांचे वाटप बालभारतीकडून करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील अनेक शाळांत पुस्तकांचे १०० टक्के वाटप झाले आहे.

पुस्तकांचे वाटप करण्यात आलेल्या शाळांमध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीकोरी पुस्तके मिळणार आहेत.

दरम्यान, पुस्तकांची सगळ्यात जास्त मागणी नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिकेकडून बालभारतीकडे करण्यात आली होती, अशी माहिती बालभारतीतर्फे देण्यात आली.

मोफत पुस्तके का देतात?मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी; तसेच विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात.

टॅग्स :Educationशिक्षण