शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:39 IST

राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होत असताना बंडखोरीचे गृहन जवळजवळ सर्वच पक्षांना लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी पलायन केले आहे. तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हीच स्थिती विरोधी पक्षांसोबत निवडणूक झाल्यानंतरही होऊ शकते. त्यामुळे विजयी झाल्यानंतर आमदारांना पक्षात टीकून ठेवण्याचे आव्हान आघाडीसमोर असणार आहे. किंबहुना अशाच नेत्यांचा शोध आघाडीला आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले. परंतु, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करू शकले नाही. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून कुमारस्वामी यांचे सरकार पाडले. 10 हून अधिक आमदारांनी यावेळी बंडखोरी केली होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तिच स्थिती यावेळी देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला मित्र पक्षाची मदत लागणारच आहे. त्यामुळे निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास, पुन्हा बंडखोरीला ऊत येऊ शकतो. या स्थितीपासून वाचण्यासाठी उमेदवारी देतानाच पक्षांशी निष्ठा ठेवून राहितील अशा नेत्यांनाच तिकीट देण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांकडे आहे.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.  त्यामुळे उमेदवारी देतानाच याची काळजी घेण्याचे शिवधनुष्य आघाडीला पेलावे लागणार आहे.