शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:39 IST

राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होत असताना बंडखोरीचे गृहन जवळजवळ सर्वच पक्षांना लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी पलायन केले आहे. तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हीच स्थिती विरोधी पक्षांसोबत निवडणूक झाल्यानंतरही होऊ शकते. त्यामुळे विजयी झाल्यानंतर आमदारांना पक्षात टीकून ठेवण्याचे आव्हान आघाडीसमोर असणार आहे. किंबहुना अशाच नेत्यांचा शोध आघाडीला आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले. परंतु, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करू शकले नाही. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून कुमारस्वामी यांचे सरकार पाडले. 10 हून अधिक आमदारांनी यावेळी बंडखोरी केली होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तिच स्थिती यावेळी देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला मित्र पक्षाची मदत लागणारच आहे. त्यामुळे निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास, पुन्हा बंडखोरीला ऊत येऊ शकतो. या स्थितीपासून वाचण्यासाठी उमेदवारी देतानाच पक्षांशी निष्ठा ठेवून राहितील अशा नेत्यांनाच तिकीट देण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांकडे आहे.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.  त्यामुळे उमेदवारी देतानाच याची काळजी घेण्याचे शिवधनुष्य आघाडीला पेलावे लागणार आहे.