शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:39 IST

राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होत असताना बंडखोरीचे गृहन जवळजवळ सर्वच पक्षांना लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात नेत्यांनी पलायन केले आहे. तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हीच स्थिती विरोधी पक्षांसोबत निवडणूक झाल्यानंतरही होऊ शकते. त्यामुळे विजयी झाल्यानंतर आमदारांना पक्षात टीकून ठेवण्याचे आव्हान आघाडीसमोर असणार आहे. किंबहुना अशाच नेत्यांचा शोध आघाडीला आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले. परंतु, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करू शकले नाही. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून कुमारस्वामी यांचे सरकार पाडले. 10 हून अधिक आमदारांनी यावेळी बंडखोरी केली होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तिच स्थिती यावेळी देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला मित्र पक्षाची मदत लागणारच आहे. त्यामुळे निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास, पुन्हा बंडखोरीला ऊत येऊ शकतो. या स्थितीपासून वाचण्यासाठी उमेदवारी देतानाच पक्षांशी निष्ठा ठेवून राहितील अशा नेत्यांनाच तिकीट देण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांकडे आहे.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे.  त्यामुळे उमेदवारी देतानाच याची काळजी घेण्याचे शिवधनुष्य आघाडीला पेलावे लागणार आहे.