शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सुरक्षेसाठी प्रभावी कायदे गरजेचे :  रिअर अ‍ॅडमिरल मोहित गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 12:43 IST

सायबर हल्ल्यांना बळी पडण्यामध्ये जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो..

ठळक मुद्देमिलीट येथे ‘सायबर सुरक्षा- राष्ट्रीय धोरण आणि बदलते तंत्रज्ञान’ विषयावर कार्यशाळा२०२० पर्यंत देशाचे सायबर सुरक्षा धोरण तयार होणारशाळांमध्ये सायबर सुरक्षा विषय सक्तीचा हवा

पुणे :  भारतात सायबर सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जगाचा विचार केल्यास सायबर सुरक्षेबाबत ठोस धोरण आपल्याकडे नाही. सायबर हल्ल्यांना बळी पडण्यामध्ये जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यामुळे भविष्यातील आव्हाने बघता सायबर सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी कायद्यांची निर्मिती गरजेची आहे. या सोबतच माहिती आणि तंत्रज्ञानासाठी मिळणाऱ्या अर्थसंकल्पापैकी १० टक्के आर्थिक तरतूद सायबर सुरक्षेसाठी करण्यात यावी, असे मत लष्कराच्या सायबर सुरक्षा विभागाचे प्रमुख रिअर अ‍ॅडमिरल मोहित गुप्ता यांनी केले. मिलिट्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘सायबर सुरक्षा- राष्ट्रीय धोरण आणि बदलते तंत्रज्ञान’ या  विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्याउद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुप्ता बोलत होते. यावेळी मिलिट्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख कमांडट विवेक राजहंस उपस्थित होते.गुप्ता म्हणाले, देशात सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २००८मध्ये तयार करण्यात आलेला  माहिती-तंत्रज्ञान कायदा कालबाह्य झाला आहे.  भारत ऑनलाईन व्यवहार करणारा सर्वात मोठा देश आहे. यामुळे सायबर सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  डिजिटल इंडियाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित होण्यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करत आहेत. मात्र, सायबर सुरक्षेच्या बाबतीत ते उदासीन आहेत. सायबर हल्ल्याबाबत जागरूक नसल्याने अनेक घटनांना ते बळी पडत आहेत. त्याच बरोबर अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तेवढे तंत्रकुशल मनुष्यबळ पोलिसांकडे नाही. एखादा गुन्हा उघडकीस आला तरी ठोस कायदा नसल्याने गुन्हेगारांना शिक्षा करण्यात अडथळा येतो. यामुळे सायबर गुन्ह्यांची न्यायप्रक्रिया प्रभावी होण्यासाठी देशात डिजिटल ट्रिब्युनल असणे गरजेचे आहे.  डाटा प्रोटेक्शन बिलच्या माध्यमातून सार्वजनिक आणि व्यैयक्तिक माहितीचे वर्गीकरण करुन त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले. .............

शाळांमध्ये सायबर सुरक्षा विषय सक्तीचा हवासंगणाकाची ओळख शालेय जीवनापासूनच व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात माहिती आणि तंत्रज्ञान विषय समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र, या विषयात सायबर सुरक्षेबाबत तोंडओळख होण्यापुरतीही माहिती नाही. यामुळे या बाबत विद्यार्थी अनभिज्ञ राहत आहेत. प्रगत देशांचा विचार केल्यास शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत ज्ञान दिले जाते. भारतातही विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून या विषयाची माहिती व्हावी यासाठी अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा हा विषय अनिवार्य करायला हवा तसेच त्याचे प्रभावी शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. .....

२०२० पर्यंत देशाचे सायबर सुरक्षा धोरण तयार होणारभारतात सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ठोस धोरण नाही. मात्र, त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात काम होत आहेत. २००८ चा सायबर सुरक्षा कायदा जरी कालबाह्य झाला आहे मात्र, मोठ्या देशांच्या सायबर धोरणाचा अभ्यास करून आज देशाचे सायबर सुरक्षा धोरण बनविण्याचे काम सुरू आहे. येत्या २०२0 पर्यंत हे धोरण तयार होऊन त्यांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ..........

भारताची स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टीम हवीपूर्वी देशात सायबर सुरक्षा धोरण केवळ मंत्रालय, सरकारी यंत्रणा यांच्यापुरते  मर्यादित होते. आजच्या घडीला ते व्यापक प्रमाणावर राबविणे गरजेचे आहे. आपल्या देशातील अनेक युवक हे मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या संगणक कंपन्यात नोकरी करत आहेत. परंतु आजही आपण आपल्या येथील संगणकात त्यांनी बनवलेली ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करत आहोत. सायबर सुरक्षा धोरणाचा विचार करून अमेरिका, चीन व रशिया यांनी स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम बनवल्या आहे. आपल्याकडे बुद्धिमत्ता असूनही याप्रकारची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम नाही. येत्या काळात अशाप्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम निर्मितीकडे भर दिला पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसGovernmentसरकार