शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज : राजेंद्रसिंह

By admin | Updated: February 4, 2017 00:02 IST

प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन

कोल्हापूर : ‘शहराची जीवनदायिनी’ असणाऱ्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष धोरण ठरवून कडक कायदा करायला हवा व त्याची अंमलबजावणीदेखील काटेकोरपणे व्हायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूर हा देशातील सर्वाधिक नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संपन्नता असलेला जिल्हा आहे. येथील संपन्नतेबरोबरच काही चुकीच्या गोष्टी ही येथे आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या जलस्रोतांचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ७०० हेक्टर जमीन क्षारपड बनली आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण प्रकल्पासारखी तात्पुरती उपाययोजना कामाची नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करायला हवा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.कोल्हापूरचे मानवी व नैसर्गिक आरोग्य यांची सांगड घालीत विकासाचे नियोजन केल्यास पंचगंगेसारखी नदी प्रदूषणमुक्त करता येईलच; त्यासह मानवी आरोग्याचा दर्जाही वाढविता येईल. यासाठी जनजागृतीबरोबरच शासकीय स्तरावर प्रयत्न गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला डॉ. एम. एम. अली, डॉ. ए. आर. कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, आदी उपस्थित होते. डॉ. राणा म्हणाले नदीपात्राच्या दोन्ही बाजूस पाच किलोमीटरपर्यंत सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा.नदीला आपण माता म्हणतो, मग तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारीराज्यात सर्वाधिक धरणे असूनही जलनियोजनाकडे दुर्लक्ष झालेअर्थसंकल्पात कृषिक्षेत्राकडे अधिक लक्ष द्यायला हवेलोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना यशस्वी; परंतु ठेकेदारांमुळे योजनेवर प्रश्नचिन्हमानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर व अधिक गुंतागुंतीचा,भयानक बनत चालला आहे.नदीजोड प्रकल्प देशासाठी अहिताचाकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शुक्रवारी प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.