शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज : राजेंद्रसिंह

By admin | Updated: February 4, 2017 00:02 IST

प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन

कोल्हापूर : ‘शहराची जीवनदायिनी’ असणाऱ्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष धोरण ठरवून कडक कायदा करायला हवा व त्याची अंमलबजावणीदेखील काटेकोरपणे व्हायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूर हा देशातील सर्वाधिक नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संपन्नता असलेला जिल्हा आहे. येथील संपन्नतेबरोबरच काही चुकीच्या गोष्टी ही येथे आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या जलस्रोतांचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ७०० हेक्टर जमीन क्षारपड बनली आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण प्रकल्पासारखी तात्पुरती उपाययोजना कामाची नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करायला हवा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.कोल्हापूरचे मानवी व नैसर्गिक आरोग्य यांची सांगड घालीत विकासाचे नियोजन केल्यास पंचगंगेसारखी नदी प्रदूषणमुक्त करता येईलच; त्यासह मानवी आरोग्याचा दर्जाही वाढविता येईल. यासाठी जनजागृतीबरोबरच शासकीय स्तरावर प्रयत्न गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला डॉ. एम. एम. अली, डॉ. ए. आर. कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, आदी उपस्थित होते. डॉ. राणा म्हणाले नदीपात्राच्या दोन्ही बाजूस पाच किलोमीटरपर्यंत सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा.नदीला आपण माता म्हणतो, मग तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारीराज्यात सर्वाधिक धरणे असूनही जलनियोजनाकडे दुर्लक्ष झालेअर्थसंकल्पात कृषिक्षेत्राकडे अधिक लक्ष द्यायला हवेलोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना यशस्वी; परंतु ठेकेदारांमुळे योजनेवर प्रश्नचिन्हमानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर व अधिक गुंतागुंतीचा,भयानक बनत चालला आहे.नदीजोड प्रकल्प देशासाठी अहिताचाकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शुक्रवारी प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.