शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज : राजेंद्रसिंह

By admin | Updated: February 4, 2017 00:02 IST

प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन

कोल्हापूर : ‘शहराची जीवनदायिनी’ असणाऱ्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष धोरण ठरवून कडक कायदा करायला हवा व त्याची अंमलबजावणीदेखील काटेकोरपणे व्हायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूर हा देशातील सर्वाधिक नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संपन्नता असलेला जिल्हा आहे. येथील संपन्नतेबरोबरच काही चुकीच्या गोष्टी ही येथे आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या जलस्रोतांचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ७०० हेक्टर जमीन क्षारपड बनली आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण प्रकल्पासारखी तात्पुरती उपाययोजना कामाची नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करायला हवा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.कोल्हापूरचे मानवी व नैसर्गिक आरोग्य यांची सांगड घालीत विकासाचे नियोजन केल्यास पंचगंगेसारखी नदी प्रदूषणमुक्त करता येईलच; त्यासह मानवी आरोग्याचा दर्जाही वाढविता येईल. यासाठी जनजागृतीबरोबरच शासकीय स्तरावर प्रयत्न गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला डॉ. एम. एम. अली, डॉ. ए. आर. कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, आदी उपस्थित होते. डॉ. राणा म्हणाले नदीपात्राच्या दोन्ही बाजूस पाच किलोमीटरपर्यंत सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा.नदीला आपण माता म्हणतो, मग तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारीराज्यात सर्वाधिक धरणे असूनही जलनियोजनाकडे दुर्लक्ष झालेअर्थसंकल्पात कृषिक्षेत्राकडे अधिक लक्ष द्यायला हवेलोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना यशस्वी; परंतु ठेकेदारांमुळे योजनेवर प्रश्नचिन्हमानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर व अधिक गुंतागुंतीचा,भयानक बनत चालला आहे.नदीजोड प्रकल्प देशासाठी अहिताचाकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शुक्रवारी प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.