शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

राष्ट्रवादीची 'ही' खेळी काँग्रेसला पडणार भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 15:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोनच नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. हा पेच सुटला असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे.  इथेच राष्ट्रवादीची डाव साधला असून आगामी काळात हे काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. 

महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. काँग्रेसकडून शेतकरी नेते नाना पटोले अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षांऐवजी उपमुख्यमंत्रीपद हवं होतं. मात्र त्यांना विधानसभा अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्यात यश मिळवले आहे. 

प्रसिद्धच्या दृष्टीने उपमुख्यमंत्रीपद अत्यंत आवश्यक आहे. याचं महत्त्व राष्ट्रवादीला चांगलेच ठावूक होते. सरकारी जाहिरातीत प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पेपरवर दिसतो. त्यात विधानसभा अध्यक्षांना स्थान नसते. आता राष्ट्रवादीकडे हे पद गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांचा फोटो दिसणार आहे. यामुळे सर्वसामान्यांत हे सरकार केवळ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे का, असा संदेश जाण्याचा संभव आहे. याविषयी एक काँग्रेस नेत्याने नाराजी देखील दर्शविली होती. 

एकूनच राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे.