शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीचा ६ मेपासून कोकणात हल्लाबोल,  सुनील तटकरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:44 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा ६ मेपासून कोकणातून सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा ६ मेपासून कोकणातून सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.या हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात पालघर जिल्ह्यातून होणार असून ६ व ७ मे रोजी पालघर आणि ११ ते १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात होणार आहे. तर १ ते ५ जून रोजी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन होणार आहे.खोटारड्या आणि नाकर्त्या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे हल्लाबोल आंदोलन केले. कोल्हापूरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ३८ ठिकाणी सभा झाल्या. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जसा प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद चौथ्या टप्प्याच्याही आंदोलनाला मिळाला. तरुणवर्ग, महिला, राष्ट्रवादीसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. राष्ट्रवादीच्या आंदोलनातून लोकांनी सरकारविरोधातील आपला संताप व्यक्त केल्याचे दिसून आले, असेही तटकरे या वेळी म्हणाले.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनातून ८८ सभा झाल्या. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन म्हणतात की, हल्लाबोल आंदोलनाबाबत आम्हाला माहिती नाही. त्याबाबत एकही निवेदन मिळाले नाही. आम्ही सर्वप्रांत, तहसीलदारांना निवेदन दिले आहे. हल्लाबोल आंदोलनातून दिलेली निवेदने मंत्रालयात पोचली नाहीत, असे गिरीश महाजन म्हणत असतील, तर मंत्रालय आणि स्थानिक पातळीवर संवाद नाही हे यातून दिसून येते, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.नाणार प्रकल्पाबाबत कोकणवासीयांची मोठी फसवणूक सरकारने केली आहे. आम्ही सरकारमध्ये असताना कोकणात रासायनिक प्रक्रिया करणारे प्रकल्प नकोत, अशी भूमिका घेतली होती. पर्यावरण उद्ध्वस्त करणाºया या प्रकल्पाला आम्ही आधीपासूनच विरोध करत आहोत. १० मे रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देणार आहेत, अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस