शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

राष्ट्रवादीत बंडखोरी होणार नाही - तटकरेंना विश्वास

By admin | Updated: September 22, 2016 18:29 IST

जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मिटले आहेत.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २२ : जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मिटले आहेत. सर्वनेते एकजुटीने काम करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकीत बंडखोरी, आघाड्या होणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती करतानाच सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी असल्याने राष्ट्रवादीलाच चांगले यश येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटबांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरु  आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रवादी भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, पक्षनिरीक्षक जीवनराव गोरे, आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, जि.प. अध्यक्ष विजयसिंह ंपंडित, माजी आ. उषा दराडे, सय्यद सलीम, नंदकिशोर मुंदडा, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, अ‍ॅड. शेख शफीक, अ‍ॅड. हेमा पिंपळे, परमेश्वर सातपुते यांची उपस्थिती होती. तटकरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या संदर्भाने वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झालेली आहे. सत्ताधारी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात करसवलती दिल्या होत्या, आता मात्र करात वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईत होरपळून निघत आहे. मराठा आरक्षण, डान्सबार बंदीचे निर्णय न्यायालयात टिकत नाहीत. सरकार तज्ज्ञ वकिलांमार्फ त न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडत असल्याची टीकाही त्यांनी केली. स्मार्टसिटी, वॉटर ग्रीड या घोषणा हवेतच असून स्मार्टसिटीसाठी दोन वर्षांत एक रुपया तरी दिला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.मराठा क्रांती मोर्चांबाबत सरकार बेफिकीरकोपर्डी (ता. पाथर्डी) येथील घटनेनंतर ठिकठिकाणी मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघत आहेत. समाजाच्या भावना तीव्र आहेत. लाखोंच्या संख्येने महिला व युवती सहभागी होत आहेत. शिस्तबद्धपणे निघणाऱ्या या मोर्चांची सरकारकडून आणखी गांभीर्याने नोंद घेण्यात आली नाही, असा टोला तटकरेंनी लगावला. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या संदर्भात खा. पवार यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. या कायद्यातील काही कलमांचा कमी- अधिक वापर होत असल्याने त्यात सुधारणा करता येईल का? याचा सरकारने विचार करावा, अशी मागणी पक्षाने केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.