शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:38 IST

शरद पवारांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चांविरोधात मोर्चा काढला. आता मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलंय. यापुढे फार नाटकं केल्यास दगडाला दगडानं आणि तलवारीनं तलवार उत्तर मिळेल, अशा शब्दांत राज ठाकरे आझाद मैदानातल्या सभेतून बरसले. राज ठाकरेंच्या या विधानावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी त्यांना लक्ष्य केलं.

राज ठाकरेंना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. काही जण त्यांचं भाषण ऐकायला येतात, तर काही जण त्यांना पाहायला येतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करण्यासाठी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं अभिनंदन करताना भाजपावर तोफ डागली. दिल्लीत भाजपाचा पराभव होणारच होता. दिल्लीत जे घडलं, तेच इतर राज्यांमध्येही घडू शकतं. भाजपाच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली असून आती ती थांबेल, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीच निवडून येईल, असं अनेक जण म्हणत होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूक निकालानं मला आश्चर्य वाटलं नाही. भाजपाचा पराभव होणारच होता. भाजपा देशावरील आपत्ती आहे, अशा शब्दांत पवारांनी भाजपाला लक्ष्य केलं. भाजपाचा पराभव शक्य आहे. त्यासाठी आम्ही लोकांना पर्याय द्यायला हवा, असं शरद पवार म्हणाले. धार्मिक कटुता लोकांना मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांमुळे संसदेत दहशतीचं वातावरण आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं. तरुणांना रोजगार मिळाला नाही, तर ते पंतप्रधान मोदींना दंडुक्यानं मारतील, असं काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी एका प्रचारसभेत म्हटलं होतं. त्यावर राहुल यांनी असं बोलायला नको होतं, असं मत पवारांनी व्यक्त केलं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी