शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

“बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:07 IST

NCP SP Jayant Patil Reaction On Union Budget 2024: पराभव झाल्यानंतरच्या योजनांना काही महत्त्व नाही. लोकसभेपेक्षा आता विधानसभेला आमच्यासाठी चांगले चित्र राहील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

NCP SP Jayant Patil Reaction On Union Budget 2024: महाराष्ट्राला अपेक्षा होत्या. भाजपाने तोंडाला पाने पुसली. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्र प्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे यासाठी खैरात वाटण्यात आली. देशात नवा बॅकलोक करण्यात येतो आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारने दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत असून, एनडीएतील पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या निधीची तसेच विविध योजनांची घोषणा करण्यात आली असून, यावरून इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. 

शेतकऱ्यांसाठी काहीही नाही एकच योजना आहे

शेतकऱ्यांसाठी काहीही नाही एकच योजना आहे. लँड रेकॉर्डसाठी एक योजना दिसते आहे. बजेटमधील घोषणा वाऱ्याची वरात आहे. शेतकऱ्यांसाठी एखादी पॉलिसी अशी पाहिजे होती की, केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भुर्दंड बसला, त्यांना काहीही मिळाले नाही. सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहारला योजना दिल्या. बेरोजगारीचा दर वाढला आहे.  आता त्यावर योजना काढत आहेत, तर त्याला उशीर झाला आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लाडकी बहीण, लाडका काका पुतण्या आहे सगळेच लाडके करा. पराभव झाल्यानंतरच्या योजना आहेत. लोक त्याला महत्त्व देत नसतात. महागाई आणि बेरोजगारी यासाठी काहीही दिसले नाही आमचे सरकार आले असते तर जीएसटी कमी करणार होतो.  लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगले चित्र राहील. आमच्यासाठी अच्छे दिन येणार आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी