शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:04 IST

Rohit Pawar Replied Anna Hazare:

Rohit Pawar Replied Anna Hazare: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गटाचे प्रमुख शरद पवार यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती. या टीकेला अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिले. हा पलटवार करताना अण्णा हजारेंनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अण्णा हजारेंना प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांची चौकशी झाली होती. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. त्यानंतर आता माझ्यावर आरोप करणारे खैरनार आणि अण्णा हजारे यांचे काय झाले? ते आज कुठे आहेत?, अशी विचारणा शरद पवारांनी केली होती. यावर, १० ते १२ वर्षांनंतर शरद पवारांना जाग आली आहे. अचानक जाग कशी आली माहिती नाही. त्यावेळी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असे उत्तर अण्णा हजारेंनी दिले होते. 

जेष्ठ म्हणून आदर आहेच पण गांधीवादाचा मुखवटा लावून...

अण्णा हजारेंनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी एक्सवर प्रत्युत्तर दिले आहे. २०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित  स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र देशात एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना आणि लोकशाही शेवटच्या घटका मोजत असतानाही शांतच राहिले नाही तर गायब झाले. खरे गांधीवादी असते तर संविधानाशी छेडछाड पासून ते मणिपूर अत्याचार, कुस्तीपटू आंदोलन, इलेक्टोरल बाँड घोटाळा अशा प्रत्येक प्रकरणावर गप्प न बसता बोलले असते, लढले असते. असो! जेष्ठ म्हणून आदर आहेच पण गांधीवादाचा मुखवटा लावून सोयीची आंदोलने करून जनतेच्या भावनांशी खेळणे मात्र योग्य नाही, या शब्दांत रोहित पवारांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यावर टीका केली होती. प्रत्येक पक्षात समविचारी माणसे असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच, असा खोचक टोलाही अण्णा हजारेंनी लगावला होता.

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस