शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:52 IST

NCP SP Group Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात.

NCP SP Group Jayant Patil News: आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून महायुतीतील घटक पक्षात विरोधी पक्षांचे नेते सामील होत आहेत. सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपामध्ये प्रवेश केला. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याही भाजपा प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयंत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मी इथेच आहे,  पक्षाचा मेळावा घेत आहे. तुम्ही असे का करता मला माहिती नाही. भाजपा फार मोठा पक्ष आहे. भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे मला गरिबाला का सारखे वेठीस धरता. माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षाचे नेते भेटू शकत नाहीत का? हे सर्व थांबवा.  तुम्ही पक्षांतरासाठीच भेटलो असेल असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बातमी चालवता मलाही प्रसिद्धी मिळते, माझीही कामे होतात, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले

जयश्रीताई पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, जयंत पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते  वसंतदादांपर्यंत  या कृष्णाकाठची माणसे विचाराला पक्की होती. याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होते. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले, यावर मी बोलणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, यावर्षी पूर येऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पूर येऊ नये, यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्य वेळी पाणी सोडले पाहिजे. योग्य नियोजन केले पाहिजे. अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे, त्या भागातील लोकांनी जी मते मांडले आहेत, आंदोलने केली आहेत, अशा लोकांना बोलावून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजे. परंतु, सरकारने जे आंदोलनात सहभागी नव्हते, त्यांना बोलावले आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील