शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 15:59 IST

Jayant Patil Replied Praful Patel: चिंतन शिबिरात चिंतन करायचे असते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Jayant Patil Replied Praful Patel:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असून, दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर झाले. या चिंतन शिबिरात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गटावर आरोप करताना अनेक दावे केले आहेत. याला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. 

भाजप आणि शिवसेनेबरोबर २००४ मध्येच युती होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युला ठरला होता. भाजप-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचे असे ठरलं होतं. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती. ही चर्चा आपण कोणाच्या सांगण्यावरून केली माहितीय का? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली. प्रमोद महाजन यांना त्यांचे दिल्लीतील महत्त्व कमी होईल अस वाटल्याने ही युती नको होती, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. मीडियाशी बोलताना जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार

मी त्यावेळी लहान होतो. मला तपशील माहिती नाही.ते म्हणतात २००४ ला भाजपबरोबर जाणार होते, पण तेव्हा ते गेले का? घटना काय घडली यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर शरद पवारांना भाजपबरोबर जायचे असते, तर ते यापूर्वीच गेले असते. ते भाजपबरोबर गेले नाहीत ही वस्तूस्थिती आहे. त्याचे दुःख कुणाला असेल, तर माझा त्याला नाईलाज आहे. चिंतन शिबिरात चिंतन करायचे असते, असा टोला लगावताना चिंतनात ते काही बोलले असतील. मला तपशीलात ते काय बोलले माहिती नाही. त्याबाबत काही मत व्यक्त करायचे असेल, तर ते पूर्ण काय बोलले ते ऐकूनच मी बोलेन, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु, त्यांना या सगळ्या घडामोडींमध्ये फारसे सहभागी करून घेतले नव्हते. प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगतो, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPraful Patelप्रफुल्ल पटेलPraful Patelप्रफुल्ल पटेलprafull patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस