शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 19:43 IST

Jayant Patil News: मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Jayant Patil News:मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा,  आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे  यांनी दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शब्द दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला चितपट केल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे घटक पक्षांकडून सांगितले जात आहे. पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सरकारला मुदतवाढ दिली असली तरी, मनोज जरांगे यांनी आंदोलन सोडणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच शाहगड येथे कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करणार असल्याची गॅरंटी जयंत पाटील यांनी दिली आहे. 

आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का? त्यांची मागणी प्रथम पाहावी. आमचे सरकार आले तर त्यांची मराठा आरक्षणाची मागणी पाहिली करून घेऊ, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला. तसेच दोन आठवड्याचा अधिवेशन करण्याची डाव दिसत आहे. भाषण सुरुवात आणि नंतर दोन दिवस आर्थिक बजेट मांडवे, असे आहे. अधिकचा आठवडा वाढावा ही विनंती आहे. अधिकाचे दिवस वाढवावे. न्याय मागण्यासाठी दिवस मिळावे. शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, अण्णा हजारे बराच वेळ शांत होते. गेली अनेक वर्षे त्यांचे मौन होते.  आता बोलत आहेत, हे आश्चर्य आहे. ते आता अजित पवार यांच्यावर का बोलतात? ते त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधावे. त्या आरोपमध्ये आतापर्यंत काही मिळाले नाही. त्यांचा बोलावता धनी नक्की कोण? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेस