शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“३१ हजार कोटींचं पॅकेज नव्हे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची थट्टा”; शरद पवार गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:43 IST

सरकारने दिलेलं हे पॅकेज म्हणजे केवळ आकड्यांची कसरत आहे.

NCP Sharad Pawar Group News: राज्यातील पूरग्रस्त भागासाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये "खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपये" आणि "नरेगा योजनेतून हेक्टरी ३ लाख रुपये" देण्याची तरतूद सांगण्यात आली आहे. मात्र ही आकड्यांची खेळपट्टी असून, शेतकऱ्यांच्या वेदनेला आणि त्यांच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाला न्याय देणारे नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केली.

सरकारने दिलेलं हे पॅकेज म्हणजे केवळ आकड्यांची कसरत आहे. हेक्टरी ४७ हजार रुपयात शेतकरी शेती परत उभी करणार कसा? जी जमीन वाहून गेली, बियाणं, खत, जनावरं, घरं सगळं नष्ट झालं त्याचं नुकसान या घोषणांनी भरून येणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या श्रमाची शेती वाहून गेली. त्याचं गणित सरकारला कागदावरच कळतं, पण जमिनीवरच्या वास्तवाशी त्यांचा काहीही संबंध नाही. एका हाताने मदतीचं नाव घेतलं जातं आणि दुसऱ्या हाताने त्याच शेतकऱ्याला कर्जबाजारीपणाच्या खाईत ढकललं जातं. हे पॅकेज म्हणजे फसवणुकीचा सरकारी आराखडा आहे, या शब्दांत निशाणा साधला.

सरकारच्या डोळ्यांमध्ये संवेदना नाही

सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजविषयी शंका उपस्थित करत त्यांनी विचारले या रकमेचा प्रत्यक्ष लाभ कोणत्या शेतकऱ्यापर्यंत कधी आणि कसा पोहोचणार? सर्वेक्षणाचे निकष काय आणि नुकसानाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणती वैज्ञानिक पद्धत वापरली? नरेगाच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे म्हणजे रोजगार हमीचा पैसा की नुकसानभरपाई? सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं बंद करावं. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा ठोस आराखडा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची स्पष्ट हमी आणि शेती पुन्हा उभी करण्यासाठी व्यावहारिक मदत ही काळाची गरज आहे. आकड्यांचा ढोल पिटून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची अवहेलना केली आहे.”ते पुढे म्हणाले “शरदचंद्र पवार साहेब नेहमी सांगतात शेतकरी हा देशाचा कणा आहे. पण आज सत्ताधारी त्या कण्याला मोडून टाकत आहेत. शेतकरी रडतोय, त्याच्या अंगावर चिखल आणि हातात ओढलेली नांगराची जखम आहे. पण सरकारच्या डोळ्यांमध्ये संवेदना नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ थेट नुकसानभरपाई द्या. प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र पंचनाम्यावर आधारित अहवाल जाहीर करा. कर्जमाफी आणि पुनर्वसनासाठी वेगळा कोष निर्माण करा. “शेतकऱ्यांची लढाई ही आमची लढाई आहे. आम्ही प्रत्येक पूरग्रस्त शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहोत. सरकारला आता घोषणांची नव्हे, कृतीची वेळ आली आहे, असा इशारा देण्यात आला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar group slams Maharashtra package: Insulting farmers' tears, not relief.

Web Summary : Sharad Pawar's NCP criticizes Maharashtra's flood relief package as inadequate and insensitive. The party claims the promised compensation is a cruel joke, failing to address the real devastation faced by farmers, and demands practical support, loan waivers, and rehabilitation.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार