शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

“३१ हजार कोटींचं पॅकेज नव्हे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची थट्टा”; शरद पवार गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:43 IST

सरकारने दिलेलं हे पॅकेज म्हणजे केवळ आकड्यांची कसरत आहे.

NCP Sharad Pawar Group News: राज्यातील पूरग्रस्त भागासाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये "खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपये" आणि "नरेगा योजनेतून हेक्टरी ३ लाख रुपये" देण्याची तरतूद सांगण्यात आली आहे. मात्र ही आकड्यांची खेळपट्टी असून, शेतकऱ्यांच्या वेदनेला आणि त्यांच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाला न्याय देणारे नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केली.

सरकारने दिलेलं हे पॅकेज म्हणजे केवळ आकड्यांची कसरत आहे. हेक्टरी ४७ हजार रुपयात शेतकरी शेती परत उभी करणार कसा? जी जमीन वाहून गेली, बियाणं, खत, जनावरं, घरं सगळं नष्ट झालं त्याचं नुकसान या घोषणांनी भरून येणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या श्रमाची शेती वाहून गेली. त्याचं गणित सरकारला कागदावरच कळतं, पण जमिनीवरच्या वास्तवाशी त्यांचा काहीही संबंध नाही. एका हाताने मदतीचं नाव घेतलं जातं आणि दुसऱ्या हाताने त्याच शेतकऱ्याला कर्जबाजारीपणाच्या खाईत ढकललं जातं. हे पॅकेज म्हणजे फसवणुकीचा सरकारी आराखडा आहे, या शब्दांत निशाणा साधला.

सरकारच्या डोळ्यांमध्ये संवेदना नाही

सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजविषयी शंका उपस्थित करत त्यांनी विचारले या रकमेचा प्रत्यक्ष लाभ कोणत्या शेतकऱ्यापर्यंत कधी आणि कसा पोहोचणार? सर्वेक्षणाचे निकष काय आणि नुकसानाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणती वैज्ञानिक पद्धत वापरली? नरेगाच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे म्हणजे रोजगार हमीचा पैसा की नुकसानभरपाई? सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं बंद करावं. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा ठोस आराखडा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची स्पष्ट हमी आणि शेती पुन्हा उभी करण्यासाठी व्यावहारिक मदत ही काळाची गरज आहे. आकड्यांचा ढोल पिटून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची अवहेलना केली आहे.”ते पुढे म्हणाले “शरदचंद्र पवार साहेब नेहमी सांगतात शेतकरी हा देशाचा कणा आहे. पण आज सत्ताधारी त्या कण्याला मोडून टाकत आहेत. शेतकरी रडतोय, त्याच्या अंगावर चिखल आणि हातात ओढलेली नांगराची जखम आहे. पण सरकारच्या डोळ्यांमध्ये संवेदना नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ थेट नुकसानभरपाई द्या. प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र पंचनाम्यावर आधारित अहवाल जाहीर करा. कर्जमाफी आणि पुनर्वसनासाठी वेगळा कोष निर्माण करा. “शेतकऱ्यांची लढाई ही आमची लढाई आहे. आम्ही प्रत्येक पूरग्रस्त शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहोत. सरकारला आता घोषणांची नव्हे, कृतीची वेळ आली आहे, असा इशारा देण्यात आला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar group slams Maharashtra package: Insulting farmers' tears, not relief.

Web Summary : Sharad Pawar's NCP criticizes Maharashtra's flood relief package as inadequate and insensitive. The party claims the promised compensation is a cruel joke, failing to address the real devastation faced by farmers, and demands practical support, loan waivers, and rehabilitation.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार