शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Rupali Patil : "चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:12 IST

NCP Rupali Patil Slams BJP And Chitra Wagh : रुपाली पाटील यांनी "बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. रखडलेला पाळणा आज हलला" असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंबई - शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (NCP Rupali Patil) यांनी भाजपा आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना भाजपात घेऊन गंगेत धुतलं, पवित्र केलं" असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

रुपाली पाटील यांनी "बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. रखडलेला पाळणा आज हलला" असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच चित्राताई आता संजय राठोड यांना राखी बांधायला बंगल्यावर जाणार आहेत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "भाजपा केवळ महिला सन्मानाचा दिखावा करते. मात्र यानिमित्ताने भाजपा आणि शिंदे-फडणवीसांचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आला आहे. आज शपथविधी झालेल्या निम्म्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप याच भाजपाने केले होते. पण त्यांना भाजपामध्ये घेऊन गंगेमध्ये धुतले आणि पवित्र केले. भाजपा सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहे, हेच दिसून येते" असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. 

"भाजपाच्या चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या अक्षरश: ओरडून ओरडून सांगत होते, की संजय राठोड यांनी बलात्कार केला आहे. आता त्याच संजय राठोड यांना भाजपाने पवित्र करून घेतले आहे. चित्राताई आता संजय राठोड यांना राखी बांधायला बंगल्यावर जाणार आहेत. चित्रा वाघ म्हणत आहेत, की लढेंगे और जितेंगे… चित्राताई तुमचा लढा ही खोटा आणि तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही" असं म्हणत रुपाली पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"एका संजयने मविआ सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचं जहाज बुडवेल"

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिल्याने यावरून अनेकांनी नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राठोड यांच्यावरून मनसेने ही खोचक टोला लगावला आहे. मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एक संजयने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचे जहाज बुडवेल असं दिसतंय... सब घोडे बारा टक्के..." असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSanjay Rathodसंजय राठोडNCPराष्ट्रवादी काँग्रेसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार