शहरं
Join us  
Trending Stories
1
3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
2
वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
3
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
4
लग्नघरात शोककळा, वराच्या कारखाली चिरडून वडिलांचा मृत्यू, वधूचा भाऊ गंभीर जखमी  
5
Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी
6
रात्री ११:४५ वाजता, चेन तुटली, अंधारामुळे 'ती' घाबरली; तरुणीसोबत रॅपिडो रायडरने केलं 'असं' काही...
7
अमेरिका ठरला स्वत:च्याच ट्रेनिंगचा बळी, व्हाईट हाऊस गोळीबार करणाऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा
8
दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव?
9
नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”, नेमकं कारण काय?
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
12
भावोजींसोबत मेहुणी फरार, त्रस्त पित्याची पोलिसांत तक्रार; म्हणाले, ‘लाखभर रुपयेही सोबत नेले’
13
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
14
निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!
15
Kolhapur: रक्षाविसर्जनावरुन स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून नातेवाइकांत डोके फुटेपर्यंत हाणामारी, इचलकरंजीचे चौघे जखमी
16
इंजिनिअर जावई शोधला, लग्नात ६० लाखांचा खर्च; हुंड्यासाठी छळ, लेकीने ६ महिन्यांत आयुष्य संपवलं
17
'या' EV कारवर भारतीय ग्राहक तुटून पडले; कंपनीने दर 10 मिनिटाला विकली एक इलेक्ट्रिक SUV
18
नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...
19
वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो
20
"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar : "नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं"; रोहित पवारांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 10:57 IST

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे.

सध्या देशाचं इंग्रजीतील नाव बदलून भारत करण्याच्या मुद्द्यावरून जोरदार घमासान सुरू आहे. अनेकजण इंडियाचं नामकरण भारत करण्याच्या मुद्द्याला पाठिंबा देत आहेत. तर काही जण विरोध करत आहेत. जी-२० देशांच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. केंद्र सरकार विशेष अधिवेशनामध्ये विधेयक संमत करून घेत घटनेमधून इंडिया हा शब्द हटवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एका देशाचं नाव बदलण्यासाठी देशाचे किती पैसे खर्च होतील, असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीने यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे असं ही म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं."

"देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे. त्यामुळे महागाई ,बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं. मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी ही विनंती" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

जगात सध्या १९५ हून अधिक देश आहेत. त्यामधील अनेक देशांनी कुठल्या ना कुठल्या कारणाने आपलं नाव बदललेलं आहे. त्यामुळे आपलं नाव बदलणारा भारत हा पहिला देश नसेल. मात्र केवळ नाव बदलल्याने बोलण्या  लिहिण्यापुरतं नाव बदलणार नाही. तर कागदपत्रे, संकेतस्थळे, लष्करी गणवेश एवढंच नाही तर लायसन्स प्लेटवरही हा बदल दिसणार आहे. हे सर्व बऱ्यापैकी खर्चिक असू शकतं. देशाचं नाव बदलण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचा अंदाज घेण्यासाठी कुठलाही फिक्स फॉर्म्युला नाही आहे.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणIndiaभारत