शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये”; रोहित पवारांनी भाजपला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:51 IST

राजकारण काय असते हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.

Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपला सुनावत, राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये, असा इशारा दिला आहे. 

रोहित पवार यांनी चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, यानिमित्ताने रोहित पवार या भागात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे राजकारण करू नये, असा अप्रत्यक्ष सल्ला रोहित पवारांना दिला. अहिल्यादेवी होळकर यांचं चौंडी हे जन्मस्थळ आहे. कुणीही राजकीय गोष्टी केल्या तर त्याचा इथे उपयोग होणार नाही. इथे राजकारणाला वाव नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले होते. याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले. 

राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये

राजकारणाच्या बाबतीत मला वाटते की पवारांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे पवार कधीही सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करत नाहीत. ज्या ठिकाणी खरेच राजकारण करायला हवे, तिथेच पवार राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये, या शब्दांत रोहित पवार यांनी पलटवार केला. 

दरम्यान, राजकारण कोण करते आहे, असा प्रतिप्रश्न विचारत, कार्यकर्ता म्हणून इथे येणाऱ्या लोकांना सेवा मिळते की नाही हे आम्ही बघत आहोत. याला जर ते राजकारण म्हणत असतील, तर तो त्यांचा विषय आहे. त्यांना राजकारणाशिवाय दुसरे काही कळत नाही. आम्हाला समाजकारणाशिवाय काही कळत नाही. समाजकारण काय असते हे आम्ही दाखवून देत आहोत. राजकारण काय असते हे ते त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून देत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली. 

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRam Shindeराम शिंदे