शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तर मला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:26 IST

जितेंद्र आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई: विधीमंडळातील राजदंड मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्रदेखील लिहिलं आहे. राजदंड उचलल्यानंतरही विधीमंडळाचं कामकाज सुरू राहिल्यानं आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजदंड मतदारसंघात नेण्यास परवानगी देण्याची मागणी केली.'विधानसभा अध्यक्ष विधीमंडळात असतात, तेव्हा राजदंड असतो. ते जेव्हा विधीमंडळात नसतात, तेव्हा राजदंड नसतो. ते प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असतं. राजदंड उचलल्यावर सभागृह तहकूब व्हायला हवं. मात्र आज राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचं कामकाज सुरू होतं,' असं आव्हाड यांनी म्हटलं. 'राजदंड उचलून जर प्रथा-परंपरा तुडवण्यात येत असतील आणि राजदंड केवळ शोभेची वस्तू राहणार असेल, तर मला तो माझ्या मतदारसंघात नेऊ द्या,' अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्रदेखील लिहिलं आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसदेखील आरक्षणाच्या मुद्यानं गाजला. मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लिम आरक्षणावरुन मुस्लिम आमदार आक्रमक झाले. अबू  आझमी, अब्दुल सत्तार, आसिफ शेफ, अमीन पटेल आणि अस्लम शेख हे आमदार एकत्र आले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी अध्यक्षांच्या दिशेनं कागदही भिरकावले. त्यामुळे विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन