शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

...तर मला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:26 IST

जितेंद्र आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई: विधीमंडळातील राजदंड मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्रदेखील लिहिलं आहे. राजदंड उचलल्यानंतरही विधीमंडळाचं कामकाज सुरू राहिल्यानं आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजदंड मतदारसंघात नेण्यास परवानगी देण्याची मागणी केली.'विधानसभा अध्यक्ष विधीमंडळात असतात, तेव्हा राजदंड असतो. ते जेव्हा विधीमंडळात नसतात, तेव्हा राजदंड नसतो. ते प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असतं. राजदंड उचलल्यावर सभागृह तहकूब व्हायला हवं. मात्र आज राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचं कामकाज सुरू होतं,' असं आव्हाड यांनी म्हटलं. 'राजदंड उचलून जर प्रथा-परंपरा तुडवण्यात येत असतील आणि राजदंड केवळ शोभेची वस्तू राहणार असेल, तर मला तो माझ्या मतदारसंघात नेऊ द्या,' अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्रदेखील लिहिलं आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसदेखील आरक्षणाच्या मुद्यानं गाजला. मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लिम आरक्षणावरुन मुस्लिम आमदार आक्रमक झाले. अबू  आझमी, अब्दुल सत्तार, आसिफ शेफ, अमीन पटेल आणि अस्लम शेख हे आमदार एकत्र आले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी अध्यक्षांच्या दिशेनं कागदही भिरकावले. त्यामुळे विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन