शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:56 IST

पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असून आजच्या सुनावणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अजित पवार गटाकडून जयंत पाटलांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून ते निवडून आलेले नाहीत. जयंत पाटलांचा कार्यकाळ २०२२ मध्येच संपुष्टात आला असं अजित पवार गटाने सांगितले. 

तर ३ वर्षासाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरू असतो असं जयंत पाटलांनी म्हटलं. तसेच मी निवडून आलेलो आहे. मला प्रदेशाध्यक्ष निवडीचे पत्र प्रफुल पटेल यांनीच पाठवले असंही त्यांनी उलटसाक्षीत म्हटलं. तुम्ही पक्षात कुठल्या पदावर होता आणि तुमची निवड कशी झाली असा सवाल अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटलांना केला. त्यावर मी प्रदेशाध्यक्ष पदावर होतो. २०१८ मध्ये निवडणूक झाली त्यात माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. २०२२ मध्ये राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू होती. राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. माझ्या निवडीचे पत्र प्रफुल पटेल यांच्याकडून मला मिळाले असं साक्षीत पाटलांनी सांगितले. 

तसेच कमिटीचा कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो. मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो. राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरू होती. मात्र कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो असे नाही. जोपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत माझी प्रदेशाध्यक्षपदी निवड कायम राहते असं जयंत पाटलांनी सांगितल्यावर अजित पवार गटाच्या वकिलांना पुन्हा प्रश्न विचारला. २०२१ मध्ये सुरू झालेली राज्य कमिटीची निवडणूक कधी संपली की ती अजूनही सुरू आहे? त्यावर ही प्रक्रिया सुरू आहे. काही लोक पक्षातून बाहेर गेल्यानं प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे राज्य कमिटी निवडणूक रखडली. पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले. 

दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीत जितेंद्र आव्हाडांनी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या असून त्याचे पुरावे असलेली कागदपत्रे कपाटातून गायब करण्यात आली आहेत. ज्या दोन व्यक्तींवर जबाबदारी होती त्या व्यक्तीच पक्ष सोडून गेल्याचे आव्हाड यांनी आरोप केला. जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले आहेत. संबंधित माणसे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचे काय केले माहिती नाही, असे आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवार