शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:56 IST

पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असून आजच्या सुनावणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अजित पवार गटाकडून जयंत पाटलांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून ते निवडून आलेले नाहीत. जयंत पाटलांचा कार्यकाळ २०२२ मध्येच संपुष्टात आला असं अजित पवार गटाने सांगितले. 

तर ३ वर्षासाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरू असतो असं जयंत पाटलांनी म्हटलं. तसेच मी निवडून आलेलो आहे. मला प्रदेशाध्यक्ष निवडीचे पत्र प्रफुल पटेल यांनीच पाठवले असंही त्यांनी उलटसाक्षीत म्हटलं. तुम्ही पक्षात कुठल्या पदावर होता आणि तुमची निवड कशी झाली असा सवाल अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटलांना केला. त्यावर मी प्रदेशाध्यक्ष पदावर होतो. २०१८ मध्ये निवडणूक झाली त्यात माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. २०२२ मध्ये राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू होती. राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. माझ्या निवडीचे पत्र प्रफुल पटेल यांच्याकडून मला मिळाले असं साक्षीत पाटलांनी सांगितले. 

तसेच कमिटीचा कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो. मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो. राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरू होती. मात्र कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो असे नाही. जोपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत माझी प्रदेशाध्यक्षपदी निवड कायम राहते असं जयंत पाटलांनी सांगितल्यावर अजित पवार गटाच्या वकिलांना पुन्हा प्रश्न विचारला. २०२१ मध्ये सुरू झालेली राज्य कमिटीची निवडणूक कधी संपली की ती अजूनही सुरू आहे? त्यावर ही प्रक्रिया सुरू आहे. काही लोक पक्षातून बाहेर गेल्यानं प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे राज्य कमिटी निवडणूक रखडली. पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले. 

दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीत जितेंद्र आव्हाडांनी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या असून त्याचे पुरावे असलेली कागदपत्रे कपाटातून गायब करण्यात आली आहेत. ज्या दोन व्यक्तींवर जबाबदारी होती त्या व्यक्तीच पक्ष सोडून गेल्याचे आव्हाड यांनी आरोप केला. जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले आहेत. संबंधित माणसे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचे काय केले माहिती नाही, असे आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवार