शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

“महागाई वाढतेय, PM नरेंद्र मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे”; राष्ट्रवादीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 20:48 IST

देशात पुन्हा यूपीए सरकार येणार हे निश्चित असून, तो दिवस आता दूर नाही, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: आताच्या घडीला देशात महागाईने नवा उच्चांक गाठल्याचे म्हटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे गणित दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रावर टीका करताना महागाई कमी करण्यासाठी सरकारचे काय नियोजन आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आतातरी माध्यमांशी बोलावे, अशी मागणी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी महागाईवरून केंद्रावर हल्लाबोल केला आहे. देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. अच्छे दिन आणण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, आज महागाईमुळे लोकांचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. वाढती महागाई लपवण्यासाठी जातीय तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती दिनी घडलेला हिंसाचार हा या षडयंत्राचाच भाग होता. केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीपातीचे आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला. महागाई कमी करण्यासाठी सरकारचे काय नियोजन आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतातरी माध्यमांशी बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.

देशात पुन्हा यूपीए सरकार येणार हे निश्चित आहे

'सत्तर वर्षात जे झाले नाही ते आम्ही करून दाखवू' अशी घोषणा भाजपने केली होती. त्यानुसार सत्तर वर्षात झाली नाही इतकी महागाई भाजपने करून दाखवली आहे, असा टोला महेश तपासे यांनी लगावला. तसेच शरद पवार यांना  आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पत्र लिहिले आहे. देशात जे धार्मिक द्वेषाचे राजकारण सुरू आहे त्याविरोधात पवारांनी आवाज उठवावा, असे त्यांचे म्हणणे आहे. या पत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याचे तपासे यांनी नमूद केले. याच मुद्द्यावर भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येण्यास सुरुवात झाली असून देशात पुन्हा यूपीए सरकार येणार हे निश्चित आहे. तो दिवस आता दूर नाही, असेही तपासे म्हणाले.

दरम्यान, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, त्यांचे हात बळकट व्हावे आणि सर्वांनी मिळून संविधानाचे रक्षण केले पाहिजे, ही भूमिका शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे. त्याच्या या भूमिकेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेसचीही साथ आहे, असे तपासे म्हणाले.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा