शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 14:39 IST

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार भेटी  देत आहेत.

ठळक मुद्देआमच्या सर्कसीत प्राणी आहे फक्त विदूषकाची कमतरता आहेशरद पवारांचा राजनाथ सिंह यांना टोला शरद पवारांनी राज्यात सर्कस सुरु आहे, त्यांच्या सर्कसीत प्राणी आहे हे मान्य केलं - चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार नसून सर्कस सुरु आहे असा टोला लगावला होता त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राजनाथ सिंह यांना प्रतिटोला लगावला आहे.

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार भेटी  देत आहेत. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, आमच्या सर्कशीत प्राणी आहे फक्त विदूषकाची कमतरता आहे अशा शब्दात त्यांनी राजनाथ सिंहावर टीका केली. त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी राज्यात सर्कस सुरु आहे, त्यांच्या सर्कशीत प्राणी आहे हे मान्य केलं आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो, शेवटी राजकारणात एकाने बॉल मारला आणि दुसऱ्याने टोलावला असं होत असतं. हे जास्त काळ लक्षात ठेवण्यासारखं नसतं. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे असं ते म्हणाले.

तर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनीही राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने देखील (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत अशा शब्दात मलिकांना राजनाथ सिंह यांना टोला हाणला.

काय म्हणाले होते राजनाथ सिंह?

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे, त्यात माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे, खुद्द देशातील दिग्गज नेते शरद पवारांच्या मार्गदर्शनाने हे सरकार सुरु आहे. हे सरकार सर्कस आहे. दिशाहिन सरकार चाललं आहे याची कल्पनाही मी करु शकत नाही.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी

Video:...अन् मनसे नेत्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव

Parle G: स्वदेशी आंदोलनातून मिळाली प्रेरणा; जगात गाजणाऱ्या बिस्किट कंपनीचा ‘असा’ आहे इतिहास!

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRajnath Singhराजनाथ सिंहchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा