शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळ तेच, वेळ नवी..! अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; प्रफुल पटेलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:25 IST

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत समोरच्यांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे वेगळे मुद्दे मांडले जातायेत असा आरोप पटेलांनी शरद पवार गटावर केला.

कर्जत - अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं २ दिवसीय चिंतन शिबीर कर्जत इथं आयोजित केले आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगात शरद पवार आणि अजित पवार गटात खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद सुनावणीला आहे. मात्र बऱ्याचदा अजित पवार-शरद पवार एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. त्यावर प्रफुल पटेल यांनी खुलासा केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात पुढची वाटचाल काय असावी हे निर्धारित करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. घड्याळ तेच, वेळ नवी ही आमची टॅगलाईन आहे. दोन्ही गट एकत्र येणार असं अनेकांकडून दिशाभूल करण्याचं काम होतंय. पण आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वातच काम करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत हे आम्ही स्पष्ट करतो असं पटेल यांनी म्हटलं आहे. 

प्रफुल पटेल म्हणाले की, निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या कार्यवाहीवर भाष्य करणार नाही. आमच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. आम्ही जो निर्णय घेतलाय त्यात कुठेही अडचण येणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत समोरच्यांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे वेगळे मुद्दे मांडले जातायेत. ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते किरकोळ मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतायेत. सुनावणीनंतर त्यांचे वकील कार्यकर्त्यासारखे ब्रिफ्रिंग करत असतात हे हास्यास्पद आहे. जे काही आहे ते सत्य बाहेर येणारच आहे.आम्हाला जे पुरावे द्यायचे होते ते आम्ही दिलेले आहेत. बाकीचे सगळे मुद्दे जे आज उपस्थित केले त्याचा खुलासा होणार आहे. आमची बाजू मांडण्यात अडचण वाटत नाही. आमच्या वकिलांना संधी मिळाली तर एकाच सुनावणीत सगळे मुद्दे आम्ही मांडू शकतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच निवडणूक आयोगात काय भूमिका आम्ही मांडली हे आम्हाला माहिती आहे. जगात असे कुठेही लिहिलं नाही की आजचे २ मित्र उद्या भांडू शकत नाही. आज एकत्र असणारे २ व्यक्ती उद्या वेगळी भूमिका घेऊ शकत नाही ? जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा फालतू मुद्दे घेतले जातात. पक्षात कालपर्यंत आम्ही एकत्र होतो आणि आज आमची नवीन भूमिका आहे. कायद्यात असे कुठेही लिहिले नाही असं सांगत प्रफुल पटेल यांनी शरद पवार गटानं निवडणूक आयोगासमोर मांडलेल्या युक्तिवादावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीत अजित पवार गटानं शरद पवारांविरोधात उमेदवार उभा का केला नाही असा युक्तिवाद निवडणूक आयोगात शरद पवार गटानं मांडला होता. 

भुजबळ मांडतायेत ती सरकारचीच भूमिका

छगन भुजबळ जे काही बोलले त्यात कुठेही सरकारच्या विरोधात विधान नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारची भूमिका आहे तीच भुजबळांनी मांडली. ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची सर्वांची सहमती आहे तीच भूमिका राष्ट्रवादीची आणि महायुती सरकारचीही आहे. आगामी काळात अधिवेशनात सगळ्या गोष्टी मांडण्याची संधी सर्वांना मिळेल.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण ते कायद्याच्या चौकटीत हवं अशी आमची ठाम भूमिका आहे.जेव्हा मुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी गेले होते. त्यावेळी निजामकाळातील जे दाखले असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळावे यासाठी समिती नेमली होती. त्या प्रसंगावर भुजबळ बोलले. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही असं विधान आमच्यापैकी कुणाकडूनही आलेले नाही असं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिले आहे. 

आगामी वाटचालीसाठी चिंतन

राष्ट्रवादीच्या आज आणि उद्याच्या भविष्यावर चिंतन शिबिरात चर्चा केली जात आहे. २ दिवसीय शिबीर कर्जत इथं आयोजित करण्यात आले आहे. आमच्या शिबीराच्या माध्यमातून आम्ही राजकीय उत्तर देऊ. सगळे पक्ष निवडणुकीच्या उद्देशाने काम करतायेत. आमचा पक्ष सांभाळायचा ही प्राथमिक जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला काम करायचे आहे. येणाऱ्या काळात सामाजिक जे प्रश्न निर्माण झालेत किंवा इतर महत्त्वाच्या विषयात राष्ट्रवादीची भूमिका काय असावी? राज्याचा विकास आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काय करता येईल त्यावर चिंतन शिबिरात चर्चेवर भर देण्यात येईल असं पटेलांनी म्हटलं.  

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस