शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 18:46 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

ठळक मुद्देनवाब मलिक यांचा निवडणुकांसंदर्भात दावानवाब मलिक यांची भाजपवर टीकाभाजपकडून केवळ वातावरण निर्मिती केली जात आहे - नवाब मलिक

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा काढली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला लागले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. (ncp leader nawab malik claimed that bjp cannot go beyond double digit in west bengal assembly election 2021)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व तृणमूल काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण वाढले आहे. तशातच सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच परिस्थिती पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजपला तीन आकडी संख्या गाठता येणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही

अन्य राज्यांच्या निवडणुकीत ज्या प्रकारे भाजप सरकार सत्ता, पैसा आणि बळाचा वापर करत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सांगत बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच आसामध्ये देखील भाजप सत्तेतून बाहेर होणार आहे. निकालानंतर ५० ची संख्या राहील. मग अमित शाह यांनी कन्याकुमारीचा किंवा पंतप्रधान मोदींनी आसाम, बंगालचा दौरा केला तरी काही फरक पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे

रांची येथील हरमू मैदानात आयोजित केलेल्या एका सभेत शरद पवार बोलत होते. बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष  पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, या शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 

टॅग्स :ElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१NCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाPoliticsराजकारण