शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 18:46 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

ठळक मुद्देनवाब मलिक यांचा निवडणुकांसंदर्भात दावानवाब मलिक यांची भाजपवर टीकाभाजपकडून केवळ वातावरण निर्मिती केली जात आहे - नवाब मलिक

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा काढली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला लागले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. (ncp leader nawab malik claimed that bjp cannot go beyond double digit in west bengal assembly election 2021)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व तृणमूल काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण वाढले आहे. तशातच सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच परिस्थिती पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजपला तीन आकडी संख्या गाठता येणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही

अन्य राज्यांच्या निवडणुकीत ज्या प्रकारे भाजप सरकार सत्ता, पैसा आणि बळाचा वापर करत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सांगत बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच आसामध्ये देखील भाजप सत्तेतून बाहेर होणार आहे. निकालानंतर ५० ची संख्या राहील. मग अमित शाह यांनी कन्याकुमारीचा किंवा पंतप्रधान मोदींनी आसाम, बंगालचा दौरा केला तरी काही फरक पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे

रांची येथील हरमू मैदानात आयोजित केलेल्या एका सभेत शरद पवार बोलत होते. बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष  पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, या शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 

टॅग्स :ElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१NCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाPoliticsराजकारण