शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही!; छगन भुजबळ यांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 07:44 IST

कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देकांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य.

शिवसेना आमदाराची खोट्या आरोपांची तक्रारनाशिक : राजकारणात ‘मीडिया व्हॅल्यू’ मिळविण्यासाठी ‘भुजबळ’ नावाचा वापर केला गेला. कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असून, त्याची तक्रार मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून, चौकशीची मागणीही केली आहे. मी कधीही ‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो नाही, असा टोलाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. 

ते म्हणाले, पोलिसांनी तपास करीत फोन कॉलचे रेकाॅर्डिंग तपासावे. यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. ‘भाई’ युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत काढला. 

भुजबळ म्हणाले, ज्या अशोक निकाळजे नावाचा कांदे यांनी तक्रार अर्जात उल्लेख केला आहे, त्यांनीच भुजबळ यांच्याशी आमची काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने प्रश्न मिटतो. उलट कांदे यांनीच ‘मी आमदार आहे, तुला शिकवितो असा दम दिला’ असा आरोपही निकाळजे यांनी केला आहे. 

५० वर्षांची तपश्चर्या पुरासारखी वाहून जाते राजकारणात मला ५० वर्षे झाली. ही मोठी तपश्चर्या असून, अशा प्रकारच्या घाणेरड्या आणि खोट्या आरोपांमुळे ही तपश्चर्या पुराच्या पाण्यासारखी वाहून जाते असे वाटते;  मात्र हे आरोप करणाऱ्यांच्या लक्षात येणार नाही, असेही भुजबळ यांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे