शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

देशातील कोरोना लसीकरण आधी पूर्ण करा, मग जगाला द्या; जयंत पाटील यांचा केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:23 IST

Corona Vaccination - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी प्रकाश जावडेकरांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचे कोरोना लसीकरणावरून केंद्रावर टीकास्त्रदेशातील कोरोना लसींची गरज आधी भागवा, मग जगाला पाठवा - जयंत पाटीलप्रकाश जावडेकर यांच्या आरोपाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

मुंबई : कोरोना लसीकरणावरून (Corona Vaccination) राजकीय खडाजंगी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणावरून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा आरोप केला होता. यालाच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशातील लोकांना आधी कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. (ncp leader jayant patil criticized modi govt on corona vaccination)

मुंबईत पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कोरोना लसीकरणावरून टीका केली. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या आरोपांवरून जयंत पाटील यांना विचारले असता, भारतात लस नसली तरी चालेल पण परदेशात पाठवा असे केंद्राचे धोरण आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आघाडीवर आहे. जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला

जावडेकरांनी आधी उत्तरे द्यावीत

राज्यात किती लसी आल्या याची संख्या माझ्याकडे नाही. ती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे असेल. भारतामध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. आपल्या देशात निर्माण होणाऱ्या लसी ते वेवगेळ्या देशांना का वाटत आहेत, याचे उत्तर आधी प्रकाश जावडेकर यांनी द्यावे. जगाच्या कोरोनाविरुद्ध लढाई जबाबदारी भारतावर आहेच; परंतु, आधी देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्केच कोरोना लसीकरण झाले आहे. तर ५६ टक्के लसी पडून कशी राहिल्या, असा सवाल करत प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राने १२ मार्चपर्यंत २३ लाख लसींचाच वापर केला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एकूण ५४ लाख लसी देण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ ५६ टक्के लसींचा साठा वापरलाच नाही, असा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण