शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कोरोना लसीकरण आधी पूर्ण करा, मग जगाला द्या; जयंत पाटील यांचा केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:23 IST

Corona Vaccination - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी प्रकाश जावडेकरांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचे कोरोना लसीकरणावरून केंद्रावर टीकास्त्रदेशातील कोरोना लसींची गरज आधी भागवा, मग जगाला पाठवा - जयंत पाटीलप्रकाश जावडेकर यांच्या आरोपाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

मुंबई : कोरोना लसीकरणावरून (Corona Vaccination) राजकीय खडाजंगी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणावरून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा आरोप केला होता. यालाच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशातील लोकांना आधी कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. (ncp leader jayant patil criticized modi govt on corona vaccination)

मुंबईत पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कोरोना लसीकरणावरून टीका केली. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या आरोपांवरून जयंत पाटील यांना विचारले असता, भारतात लस नसली तरी चालेल पण परदेशात पाठवा असे केंद्राचे धोरण आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आघाडीवर आहे. जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला

जावडेकरांनी आधी उत्तरे द्यावीत

राज्यात किती लसी आल्या याची संख्या माझ्याकडे नाही. ती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे असेल. भारतामध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. आपल्या देशात निर्माण होणाऱ्या लसी ते वेवगेळ्या देशांना का वाटत आहेत, याचे उत्तर आधी प्रकाश जावडेकर यांनी द्यावे. जगाच्या कोरोनाविरुद्ध लढाई जबाबदारी भारतावर आहेच; परंतु, आधी देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्केच कोरोना लसीकरण झाले आहे. तर ५६ टक्के लसी पडून कशी राहिल्या, असा सवाल करत प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राने १२ मार्चपर्यंत २३ लाख लसींचाच वापर केला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एकूण ५४ लाख लसी देण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ ५६ टक्के लसींचा साठा वापरलाच नाही, असा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण