शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Chhagan Bhujbal: "देशातील महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 20:58 IST

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा घणाघाती आरोप

Chhagan Bhujbal: महात्मा गांधी, नेहरू यांनी देशाच्या जडणडणीत दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. देशाचा इतिहास हा त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र देशातील काही मंडळींकडून देशाच्या या महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. तसेच, जे लोक असा प्रयत्न करत आहेत, त्यांचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होऊ शकत नाही, असेही छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या 'शोध गांधी नेहरू पर्वाचा' या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचा लोकार्पण सोहळा नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

"मोतीलाल नेहरू यांच्या जीवनात स्वदेशी आंदोलनाने मोठे परिवर्तन घडवले. नेहरू कुटुंबाने परदेशी वस्रांचा केवळ त्यागच केला नाही तर त्याची होळी पेटवली सारे कुटंबच खऱ्या अर्थाने आंदोलक बनले होते. आज देशात  याच महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. ज्या भारतासाठी हे महापुरुष लढले त्यांची बदनामी केली जाते हे फार दुर्दैवी असल्याचे सांगत लुटेगी आजादी अगर तो अपमान सबका है, मत फैलाओ नफ़रतें, ये जहान सबका है, इंसान बनने की आदत डालो, क्या हिन्दू क्या मुस्लिम ये हिन्दुस्तान सबका है", या पंक्तीतून भुजबळांनी आपले मत व्यक्त केले.

"आज नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे अतिशय मोठ दुर्दैव आहे. सरदार पटेल यांचं निधन झालं तेव्हा मी एकटा पडलो आहे, उदासीची पोकळी जाणवते आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला मोठा 'कॅप्टन' गमावला. देश स्वातंत्र्य झाल्यावर नेहरुंनी केलेले भाषण तर सुवर्ण अक्षरात लिहुन ठेवावं असच आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १७ वर्ष नेहरुजी पंतप्रधान होते. आधुनिक भारत उभा करताना, समाजवादी समाजरचनेची, विज्ञाननिष्ठ भारताची, संमिश्र अर्थव्यवस्थेची बलशाली करण्याची अनेक स्वप्ने त्यांनी पाहीली आणि सत्यात उतरवली", असेही ते म्हणाले.

"देशात नेहरूंनी अनेक महत्वाच्या संस्था निर्माण केल्या. भारताच्या आधुनिक जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि प्रकल्पांनी या देशाला विकासाची वाट दाखवली. देशात तंत्रज्ञानाचा जो विकास झाला तो राजीव गांधी यांच्यामुळेच झाला आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. 'क्या किया आझादी के बाद' असा सवाल सध्याच्या परिस्थितीत उपस्थित केला जात आहे. नेहरू गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्याला नेहरू गांधी पर्वाचा हे पुस्तक उत्तर आहे. भारतीच्या जडणघडणीत नेहरु- गांधी पर्वाने जो अमुलाग्र बदल घडविला तो या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सुरेश भटेवरा यांनी केलेला आहे. कितीही इतिहासातली पाने बदलण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला तरी जो पर्यंत भटेवरा यांच्या सारखे पत्रकार लिहत राहतील तो पर्यंत खरा इतिहास समोर येत जाईल असे सांगत या पुस्तकाच्या इतर भाषेत लवकरात लवकर अनुवाद करण्यात  यावा जेणेकरून संपूर्ण देशासमोर हा इतिहास मांडला जाईल" असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस