शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Chhagan Bhujbal: "देशातील महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 20:58 IST

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा घणाघाती आरोप

Chhagan Bhujbal: महात्मा गांधी, नेहरू यांनी देशाच्या जडणडणीत दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. देशाचा इतिहास हा त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र देशातील काही मंडळींकडून देशाच्या या महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. तसेच, जे लोक असा प्रयत्न करत आहेत, त्यांचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होऊ शकत नाही, असेही छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या 'शोध गांधी नेहरू पर्वाचा' या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचा लोकार्पण सोहळा नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

"मोतीलाल नेहरू यांच्या जीवनात स्वदेशी आंदोलनाने मोठे परिवर्तन घडवले. नेहरू कुटुंबाने परदेशी वस्रांचा केवळ त्यागच केला नाही तर त्याची होळी पेटवली सारे कुटंबच खऱ्या अर्थाने आंदोलक बनले होते. आज देशात  याच महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. ज्या भारतासाठी हे महापुरुष लढले त्यांची बदनामी केली जाते हे फार दुर्दैवी असल्याचे सांगत लुटेगी आजादी अगर तो अपमान सबका है, मत फैलाओ नफ़रतें, ये जहान सबका है, इंसान बनने की आदत डालो, क्या हिन्दू क्या मुस्लिम ये हिन्दुस्तान सबका है", या पंक्तीतून भुजबळांनी आपले मत व्यक्त केले.

"आज नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे अतिशय मोठ दुर्दैव आहे. सरदार पटेल यांचं निधन झालं तेव्हा मी एकटा पडलो आहे, उदासीची पोकळी जाणवते आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला मोठा 'कॅप्टन' गमावला. देश स्वातंत्र्य झाल्यावर नेहरुंनी केलेले भाषण तर सुवर्ण अक्षरात लिहुन ठेवावं असच आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १७ वर्ष नेहरुजी पंतप्रधान होते. आधुनिक भारत उभा करताना, समाजवादी समाजरचनेची, विज्ञाननिष्ठ भारताची, संमिश्र अर्थव्यवस्थेची बलशाली करण्याची अनेक स्वप्ने त्यांनी पाहीली आणि सत्यात उतरवली", असेही ते म्हणाले.

"देशात नेहरूंनी अनेक महत्वाच्या संस्था निर्माण केल्या. भारताच्या आधुनिक जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि प्रकल्पांनी या देशाला विकासाची वाट दाखवली. देशात तंत्रज्ञानाचा जो विकास झाला तो राजीव गांधी यांच्यामुळेच झाला आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. 'क्या किया आझादी के बाद' असा सवाल सध्याच्या परिस्थितीत उपस्थित केला जात आहे. नेहरू गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्याला नेहरू गांधी पर्वाचा हे पुस्तक उत्तर आहे. भारतीच्या जडणघडणीत नेहरु- गांधी पर्वाने जो अमुलाग्र बदल घडविला तो या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सुरेश भटेवरा यांनी केलेला आहे. कितीही इतिहासातली पाने बदलण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला तरी जो पर्यंत भटेवरा यांच्या सारखे पत्रकार लिहत राहतील तो पर्यंत खरा इतिहास समोर येत जाईल असे सांगत या पुस्तकाच्या इतर भाषेत लवकरात लवकर अनुवाद करण्यात  यावा जेणेकरून संपूर्ण देशासमोर हा इतिहास मांडला जाईल" असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस