शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

NCP vs BJP: लोक भारताचं नागरिकत्व का सोडत आहेत? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 14:39 IST

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलं होतं उत्तर

NCP vs BJP: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांची वार्षिक आकडेवारी उपलब्ध करून दिली. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्यापूर्वीची आणि नंतरची अशी आकडेवारी त्यांनी संदर्भासाठी सांगितली. त्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले. भाजपा सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी मोदी सरकारला केला.

"जयशंकर हे ठसवण्याचा प्रयत्न करत होते की गेल्या काही वर्षांत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी-अधिक प्रमाणात सारखीच होती. पण यात एक लक्षात घेणे आवश्यक आहे की २०२१ मध्ये सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे. गेल्या दशकातील नागरिकत्व सोडणाऱ्यांची ही सर्वोच्च संख्या आहे, हे सरकारी आकडेवारी दर्शवते. परराष्ट्र मंत्र्यांनी जसे नागरिकत्वाबाबत २०१४ पूर्वीचे व नंतरचे दाखले दिले त्याप्रमाणेच आता बेरोजगारी, महागाई, जीडीपी आणि कच्च्या तेलाच्या किमतीच्या तुलनेत इंधनाच्या किमती आदीचा २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा डेटा देखील दाखवावा," असे क्रास्टो यांनी आवाहन केले.

"भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरच आपला देश भारत कसा प्रगतीपथावर आहे आणि कसा समृद्ध झाला आहे, हे सतत ठसवले जात आहे. यावर विश्वास ठेवायचा असेल, तर प्रश्न असा पडतो की, मग लोक आपले भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत? भाजप सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. श्री एस जयशंकर कदाचित इतर सर्व डेटा देणार नाहीत. कारण सत्य हे आहे की, अनेक भारतीय आपले नागरिकत्व सोडत आहेत आणि भारतातील उच्च बेरोजगारीमुळे परदेशात निघून जात आहेत. ज्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आपली पडझड झाली होती. हे तथ्य सरकारी आकडेवारीनेच सिद्ध केले आहे, जी म्हणते की आपल्या देशातील ४५ वर्षातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा