शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

NCP vs BJP: लोक भारताचं नागरिकत्व का सोडत आहेत? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 14:39 IST

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलं होतं उत्तर

NCP vs BJP: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांची वार्षिक आकडेवारी उपलब्ध करून दिली. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्यापूर्वीची आणि नंतरची अशी आकडेवारी त्यांनी संदर्भासाठी सांगितली. त्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले. भाजपा सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी मोदी सरकारला केला.

"जयशंकर हे ठसवण्याचा प्रयत्न करत होते की गेल्या काही वर्षांत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी-अधिक प्रमाणात सारखीच होती. पण यात एक लक्षात घेणे आवश्यक आहे की २०२१ मध्ये सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे. गेल्या दशकातील नागरिकत्व सोडणाऱ्यांची ही सर्वोच्च संख्या आहे, हे सरकारी आकडेवारी दर्शवते. परराष्ट्र मंत्र्यांनी जसे नागरिकत्वाबाबत २०१४ पूर्वीचे व नंतरचे दाखले दिले त्याप्रमाणेच आता बेरोजगारी, महागाई, जीडीपी आणि कच्च्या तेलाच्या किमतीच्या तुलनेत इंधनाच्या किमती आदीचा २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा डेटा देखील दाखवावा," असे क्रास्टो यांनी आवाहन केले.

"भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरच आपला देश भारत कसा प्रगतीपथावर आहे आणि कसा समृद्ध झाला आहे, हे सतत ठसवले जात आहे. यावर विश्वास ठेवायचा असेल, तर प्रश्न असा पडतो की, मग लोक आपले भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत? भाजप सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. श्री एस जयशंकर कदाचित इतर सर्व डेटा देणार नाहीत. कारण सत्य हे आहे की, अनेक भारतीय आपले नागरिकत्व सोडत आहेत आणि भारतातील उच्च बेरोजगारीमुळे परदेशात निघून जात आहेत. ज्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आपली पडझड झाली होती. हे तथ्य सरकारी आकडेवारीनेच सिद्ध केले आहे, जी म्हणते की आपल्या देशातील ४५ वर्षातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा