शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

NCP vs BJP: लोक भारताचं नागरिकत्व का सोडत आहेत? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 14:39 IST

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलं होतं उत्तर

NCP vs BJP: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांची वार्षिक आकडेवारी उपलब्ध करून दिली. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्यापूर्वीची आणि नंतरची अशी आकडेवारी त्यांनी संदर्भासाठी सांगितली. त्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले. भाजपा सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी मोदी सरकारला केला.

"जयशंकर हे ठसवण्याचा प्रयत्न करत होते की गेल्या काही वर्षांत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी-अधिक प्रमाणात सारखीच होती. पण यात एक लक्षात घेणे आवश्यक आहे की २०२१ मध्ये सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे. गेल्या दशकातील नागरिकत्व सोडणाऱ्यांची ही सर्वोच्च संख्या आहे, हे सरकारी आकडेवारी दर्शवते. परराष्ट्र मंत्र्यांनी जसे नागरिकत्वाबाबत २०१४ पूर्वीचे व नंतरचे दाखले दिले त्याप्रमाणेच आता बेरोजगारी, महागाई, जीडीपी आणि कच्च्या तेलाच्या किमतीच्या तुलनेत इंधनाच्या किमती आदीचा २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा डेटा देखील दाखवावा," असे क्रास्टो यांनी आवाहन केले.

"भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरच आपला देश भारत कसा प्रगतीपथावर आहे आणि कसा समृद्ध झाला आहे, हे सतत ठसवले जात आहे. यावर विश्वास ठेवायचा असेल, तर प्रश्न असा पडतो की, मग लोक आपले भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत? भाजप सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. श्री एस जयशंकर कदाचित इतर सर्व डेटा देणार नाहीत. कारण सत्य हे आहे की, अनेक भारतीय आपले नागरिकत्व सोडत आहेत आणि भारतातील उच्च बेरोजगारीमुळे परदेशात निघून जात आहेत. ज्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आपली पडझड झाली होती. हे तथ्य सरकारी आकडेवारीनेच सिद्ध केले आहे, जी म्हणते की आपल्या देशातील ४५ वर्षातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा