शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:50 IST

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मराठ्यांचं ओबीसीकरण होणार नसल्याचं सांगितलं आहे.

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे सुरू आहे. शेतकऱ्यांसह मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या अधिवेशनात गाजत असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं, अन्यथा आक्रमक आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या या अल्टिमेटमवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं म्हणत आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण न देता सरसकट कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करून ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. मात्र यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. आरक्षणाबाबत एखादा निर्णय घेताना तो कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत बसला पाहिजे. याआधी दोन सरकारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये मीदेखील होतो. तेव्हा आपण नारायण राणे यांच्या नेतृत्वात कमिटी तयार करून मराठा आरक्षण दिलं. मात्र दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही मराठा आरक्षण दिलं. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांसह आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की, आतापर्यंत ज्या घटकांना आरक्षण मिळालं आहे, त्यांना धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे," अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले

"आरक्षण देताना मागासवर्ग आयोगाचा अहवाल, तसंच मागे आरक्षणात हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने कोणत्या त्रुटी काढल्या, त्या त्रुटी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी सांगत आहेत की, आपल्याला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. प्रत्येकजण सध्या वेगवेगळ्या पद्धतीने आपआपली भूमिका मांडत आहे. मात्र सरकार म्हणून काम करताना आम्हाला कायदा-सुव्यवस्था, घटना या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात आणि सध्या सरकार या सर्व गोष्टी बघून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे," असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मराठ्यांचं ओबीसीकरण होणार नसल्याचं सांगितल्याने याबाबत आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण