शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

Maharashtra Political Crisis: “बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:33 IST

Maharashtra Political Crisis: ईडी कारवाईसंदर्भात संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठराखण करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवरून टीका करताना, राष्ट्रवादी काँग्रेसने संजय राऊत यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संजय राऊतांना पाठिंबा दर्शवला आहे. 

ईडी कारवाईनंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजप, केंद्रीय यंत्रणांवर खरमरीत टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांचे समर्थन करीत, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये रविवारी सुद्धा सुरू ठेवावीत. केंद्र व राज्य सरकारने ED चा आदर्श घ्यावा, असा टोलाही शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. 

‘आजादी के 75 साल’च्या नावाखाली देशभक्तीचे सोंग सुरू

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, भाजपाने हर घर तिरंगा ही मोहिम आखली आहे. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, अनेक जिल्हे महापुरात आहेत, शेती वाहून गेली, महागाई वाढली, गॅस सिलेंडर महागले, कष्टकरी आणि गरीब माणूस रोज भरडत चाललाय तर दुसरीकडे ‘आजादी के 75 साल’च्या नावाखाली देशभक्तीचे सोंग सुरू असल्याची बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे. कुठलीही ताकद लावली असती तरी फडणवीस शिवसेना फोडू शकले नसते म्हणून हे काम एका ठराविक गटाकडून सुप्त पद्धतीने केंद्रीय स्तरावरून सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन बॅनरवर मोदी, शहा, नड्डा झळकू लागले आहेत. केवळ सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूला खंबीरपणे उभा आहे, असा दावाही मिटकरींनी केला.

दरम्यान, कोर्टाचा निर्णय कसाही आला तर तो भाजपच्याच पथ्यावर पडेल. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मात्र जनतेसमोर जातेवेळी ओढवणारी नामुष्की पाहण्यासारखी असेल. सद्यस्थिती देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे येऊन वेळ प्रसंग पडला तर अपमानही पचवून घेत आहेत. सर्व प्रकरणात भाजपचा तिळमात्र तोटा होणार नाही. शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेची तोडफोड करण्याचे काम छुप्या पद्धतीने सुरू आहे आणि हे सर्व दिल्लीवरून ठरलेले आहे, असा घणाघाती आरोप अमोल मिटकरींनी ट्विटरवरून केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rautसंजय राऊतAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस