शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

Maharashtra Political Crisis: “बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:33 IST

Maharashtra Political Crisis: ईडी कारवाईसंदर्भात संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठराखण करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवरून टीका करताना, राष्ट्रवादी काँग्रेसने संजय राऊत यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संजय राऊतांना पाठिंबा दर्शवला आहे. 

ईडी कारवाईनंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजप, केंद्रीय यंत्रणांवर खरमरीत टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांचे समर्थन करीत, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये रविवारी सुद्धा सुरू ठेवावीत. केंद्र व राज्य सरकारने ED चा आदर्श घ्यावा, असा टोलाही शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. 

‘आजादी के 75 साल’च्या नावाखाली देशभक्तीचे सोंग सुरू

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, भाजपाने हर घर तिरंगा ही मोहिम आखली आहे. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, अनेक जिल्हे महापुरात आहेत, शेती वाहून गेली, महागाई वाढली, गॅस सिलेंडर महागले, कष्टकरी आणि गरीब माणूस रोज भरडत चाललाय तर दुसरीकडे ‘आजादी के 75 साल’च्या नावाखाली देशभक्तीचे सोंग सुरू असल्याची बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे. कुठलीही ताकद लावली असती तरी फडणवीस शिवसेना फोडू शकले नसते म्हणून हे काम एका ठराविक गटाकडून सुप्त पद्धतीने केंद्रीय स्तरावरून सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन बॅनरवर मोदी, शहा, नड्डा झळकू लागले आहेत. केवळ सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूला खंबीरपणे उभा आहे, असा दावाही मिटकरींनी केला.

दरम्यान, कोर्टाचा निर्णय कसाही आला तर तो भाजपच्याच पथ्यावर पडेल. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मात्र जनतेसमोर जातेवेळी ओढवणारी नामुष्की पाहण्यासारखी असेल. सद्यस्थिती देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे येऊन वेळ प्रसंग पडला तर अपमानही पचवून घेत आहेत. सर्व प्रकरणात भाजपचा तिळमात्र तोटा होणार नाही. शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेची तोडफोड करण्याचे काम छुप्या पद्धतीने सुरू आहे आणि हे सर्व दिल्लीवरून ठरलेले आहे, असा घणाघाती आरोप अमोल मिटकरींनी ट्विटरवरून केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rautसंजय राऊतAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस