शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

भारतरत्नांनी पदाला साजेसं बोलावं; मंगेशकर, तेंडुलकर यांच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे: अमोल मिटकरी

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 12:26 IST

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याला उत्तर देताना मंगेशकर असो वा तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देअमोल मिटकरी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवारमंगेशकर असो वा तेंडुलकर, ट्विटची चौकशी झालीच पाहिजे - अमोल मिटकरीट्विटच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई :शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, समर्थन देण्यावरून सुरू झालेलं ट्विटरवॉर शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्यात येण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याला उत्तर देताना मंगेशकर असो वा तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. (ncp leader amol mitkari criticized devendra fadnavis over Celebrities tweet) 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, असे म्हटले आहे. ''सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी झालीच पाहिजे. मग, मंगेशकर असोत की तेंडुलकर! 'भारतरत्नांनी' पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा'', असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. 

शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. भारताच्या अंतर्गत मुद्द्यावरून परदेशातील सेलिब्रिटिंनी केवळ बघ्याची भूमिका घ्यावी. देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू, अशा आशयाचे ट्विट्स भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसह अनेक कलाकार, खेळाडू आणि दिग्गज मंडळींनी केले होते. यानंतर शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये बरेच साधर्म्य दिसून येत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट उघड; नांदेडमधून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटकेत

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्याचा निर्णय हा संतापजनक असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTwitterट्विटरFarmers Protestशेतकरी आंदोलन