शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Maharashtra Politics: “...तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे”; अजित पवारांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 09:13 IST

Maharashtra News: जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा आम्ही विरोध केला होता, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: अलीकडेच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजप आणि शिंदे गट तसेच महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. शिंदे गटानेही करून दाखवत ठाकरे गटाला मागे टाकले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भूमिका मांडत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे, अशी मागणी केली. 

अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव जेव्हा विधिमंडळात मांडला, त्याला आम्ही विरोध केला होता. सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार असेल तर नगराध्यक्ष, महापौर, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानही जनतेमधून निवडण्यात यावा, अशी आमची भूमिका होती. जनतेमधून सरपंचाची थेट निवड झाल्याने बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण होतो. सरपंच आणि सदस्य वेगवेगळ्या विचारांचे असतील तर मग बघायलाच नको. यामध्ये गाव मात्र निष्कारण भरडले जाते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. 

आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची?

दुसरीकडे, राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणे, हे अतिशय चुकीचे आहे. यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढते. उद्योग बाहेर गेले, तर आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची. लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे, या शब्दांत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, एकीकडे राज्यातून मोठे प्रकल्प गेले आणि दुसरीकडे राजकीय व्यक्तीकडून अशाप्रकारचे समर्थन होते असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्माण होतील, असे अजित पवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर