शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

Maharashtra Politics: “...तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे”; अजित पवारांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 09:13 IST

Maharashtra News: जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा आम्ही विरोध केला होता, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: अलीकडेच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजप आणि शिंदे गट तसेच महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. शिंदे गटानेही करून दाखवत ठाकरे गटाला मागे टाकले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भूमिका मांडत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे, अशी मागणी केली. 

अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव जेव्हा विधिमंडळात मांडला, त्याला आम्ही विरोध केला होता. सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार असेल तर नगराध्यक्ष, महापौर, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानही जनतेमधून निवडण्यात यावा, अशी आमची भूमिका होती. जनतेमधून सरपंचाची थेट निवड झाल्याने बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण होतो. सरपंच आणि सदस्य वेगवेगळ्या विचारांचे असतील तर मग बघायलाच नको. यामध्ये गाव मात्र निष्कारण भरडले जाते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. 

आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची?

दुसरीकडे, राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणे, हे अतिशय चुकीचे आहे. यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढते. उद्योग बाहेर गेले, तर आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची. लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे, या शब्दांत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, एकीकडे राज्यातून मोठे प्रकल्प गेले आणि दुसरीकडे राजकीय व्यक्तीकडून अशाप्रकारचे समर्थन होते असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्माण होतील, असे अजित पवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर