शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मला खेळखंडोबा करायचा नाही, पण...; पवारांबद्दल प्रश्न विचारताच अजितदादांची रोखठोक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:08 IST

अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचत पक्षाच्या शिबिरात केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.

रायगड :राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गटांत सुरू झालेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाने आपल्या राज्यव्यापी शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन काल शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे बोलताना पुन्हा एकदा आपण केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करत पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र त्याचवेळी याबाबत सतत भाष्य करून मला खेळखंडोबा करायचा नाही, असंही ते म्हणाले.

माझ्याकडे भरपूर माहिती असून ती मी पुस्तक लिहिल्यावर समोर येईल, असं अजित पवार गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं. त्यावर काल शरद पवारांनी पलटवार केला होता. लोक पक्षांतर करून भाजपसोबत कसे जातात, याबाबत पुस्तकातून वाचायला आवडेल, असं पवार म्हणाले होते. याबाबत आज श्रीवर्धन येथे अजित पवारांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांवर केलेल्या प्रतिहल्ल्याबाबत बोलणं टाळत अजित पवार म्हणाले की त्याचं उत्तर प्रफुल्लभाईच देऊ शकतील. मात्र यावेळी बोलताना अजित पवार यांनी पक्षाच्या शिबिरात मांडलेली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली. 

अजित पवार यांनी म्हटलं की, "खरं सांगू का? मी काय बोललो की त्यांनी उत्तर द्यायचं...त्यांनी काय बोललं की मी उत्तर द्यायचं, असला खेळखंडोबा मला करायचा नाही. पण मी जे बोललो, ते त्रिवार सत्य आहे. तुम्हालाही माहीत आहे की, मी २ जुलैला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि अधिवेशन काळातच आम्ही सर्व मंत्री चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. मग आमच्याबद्दल तुम्हाला राग होता तर आम्हाला येऊनच नव्हतं द्यायचं. नंतर दुसऱ्या दिवशी सर्व आमदारही भेटले. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी परत आम्ही भेटलो. हे सगळं त्रिवार सत्य आहे."

"माझ्याकडून एखादी गोष्ट चुकीची घडली तर मी दिलगिरी व्यक्त करून माघार घेईल, पण पक्षाच्या शिबिराच्या निमित्ताने मी जे बोललो ते खरंच बोललो. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. त्यांनाही माझं ३०-३२ वर्षांचं समाजकारण, राजकारण माहीत आहे. मी छक्के पंजे करणारा माणूस नाही, मी स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे. आज एक बोलायचं, उद्या एक बोलायचं, हा माझा स्वभाव नाही," अशा शब्दांत अजित पवारांनी आपण आरोपांवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

अजित पवारांबद्दल काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांनी पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात केलेल्या आरोपांना काल शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. "मी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसोबत मागील ६० वर्षांपासून काम करत आहे. वैयक्तिक हल्ले, टीका-टिपण्णी याची सवय मला आहे. पण ही टीका किती योग्य आहे, ती कोण करतंय, ती योग्य आहे की नाही, हे लोक ठरवत असतात. त्यामुळे कुठूनही असे हल्ले झाले तरी हरकत नाही," असं ते म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार