शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Jayant Patil vs Eknath Shinde: "तुमची सुरतेवर स्वारी झाली अन् त्याने बदनामी महाराष्ट्राची झाली"; जयंत पाटलांचा शिंदे गटावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 20:19 IST

जयंत पाटील यांची मंत्र्यांसह सत्ताधाऱ्यावर जळजळीत टीका

Jayant Patil vs Eknath Shinde: "छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली... त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात... तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली", अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आणि मंत्र्यांना चिमटे काढले. तसेच, सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली.

जयंत पाटील यांनी नव्या सरकारमधील काही मंत्र्यांची आणि अद्याप न होऊ शकलेल्या मंत्र्यांची खिल्ली उडवली. "८० टक्के मार्क मिळालेल्यांनी २० टक्के मार्क असलेल्या लोकांना पाठिंबा दिला. चिमणआबा तुम्ही गुवाहाटीत पहिल्या लॉटमध्ये गेलात... ससा आणि कासवाची कथा तुम्हाला माहीत आहे. गुलाबराव पाटील उशिरा आले आणि पहिले मंत्री झाले. चिमणआबा मात्र पाठीमागे राहिले व मंत्री झालेच नाहीत. यांच्यासाठी कोणते मेरीट लावले? गुलाबरावांना मंत्री केलं त्याला विरोध नाही पण चिमणआबा काय झाले तुमचे... शिरसाटांना मंत्री का केले नाही आता कसं अडजेस्ट करणार त्यांना... संघाचे काम नाना किती वर्ष केलं तुम्ही... नानांची निष्ठेची टोपी बाहेर ठेवली गेली आणि कॉंग्रेसकडून आलेल्या सत्तारांना मंत्री केले.. नानांसारख्या ज्येष्ठ माणसाचा विचार का केला नाही.. दादा भुसे चांगले कृषी मंत्री म्हणून काम केलं असताना त्यांनाही वेगळंच खातं दिलं", अशी खोचक विधाने जयंत पाटलांनी केली.

"खातेवाटपात काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलंच. चंद्रकांत पाटील यांच्यावर केवढा अन्याय.. या मंत्रीमंडळात एकच ध्रुवतारा तो म्हणजे गुलाबराव पाटील... त्यांचे पाणी पुरवठा खाते कुणी बदलले नाही... शंभुराजे देसाई यांना एक्साईज खातं दिलं... ते खातं गणेश नाईक यांच्याकडे होते त्यामुळे तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही मंदाताई यांना चांगलं माहिती आहे. बच्चू कडू सध्या अडीच वर्षे सह्यांवर दिवस काढतील असं वाटतं. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार पण कधी पाळणार? हल्ली तुम्हाला घेरलेले आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री करा असं मला वाटतं", असेही ते म्हणाले.

"आमचीच युती अनैसर्गिक कशी?"

निवडणुका झाल्यावर युती होते परंतु आमची झाली ती अनैसर्गिक युती कशी काय? या आधीही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई यांना राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्या वेळी पाठिंबा दिला होता. ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती, तेव्हा शिवसेना सत्याच्या बाजूने उभी राहिली. आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही अनैसर्गिक युती होती असं बोलता. आमच्या बरोबर होता त्यावेळी असा शब्द काढला नाही. भाजपसोबत युती नैसर्गिक युती आणि आमच्या सोबत अनैसर्गिक युती हे कसं काय?", असा प्रश्न त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाला विचारला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेJayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेना