शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुकीसाठी आम्ही तयार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:44 IST

Maharashtra Political Crisis: जनतेला प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय झाली असून, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले, तेव्हा कोट्यावधींची देवाणघेवाण झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून केलेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपने सक्रीय होत सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि शिंदे गटाला पाठिंबा दर्शवत नवे सरकार स्थापन केले. यानंतर आता नवे शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत नवनवे दावे आणि भाकिते केली जात आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, लवकरच पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार कोसळले, असे भाकित केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेले नाही

मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजप आणि शिंदे गटाला त तितकेसे सोपे जाणार नाही. कारण लोकांना प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. त्या लोकांचा सध्या अपेक्षा भंग झाला आहे. सन २०२४ ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्विकारले असते. पण आता महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेले लोकांना पटलेले नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. 

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळे महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असे वाटत नाही. शिंदे गटालील आमदारांचे पुढच्या टर्मला निवडूण येणे कठीण आहे, असे जयंत पाटील म्हणाले. तत्पूर्वी काही दिवसांआधी मध्यावधी निवडणुका लागतील का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सरकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत, असे शरद पवार म्हणाले होते. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस