शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुकीसाठी आम्ही तयार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 14:44 IST

Maharashtra Political Crisis: जनतेला प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय झाली असून, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले, तेव्हा कोट्यावधींची देवाणघेवाण झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून केलेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपने सक्रीय होत सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि शिंदे गटाला पाठिंबा दर्शवत नवे सरकार स्थापन केले. यानंतर आता नवे शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत नवनवे दावे आणि भाकिते केली जात आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, लवकरच पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार कोसळले, असे भाकित केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेले नाही

मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजप आणि शिंदे गटाला त तितकेसे सोपे जाणार नाही. कारण लोकांना प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. त्या लोकांचा सध्या अपेक्षा भंग झाला आहे. सन २०२४ ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्विकारले असते. पण आता महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेले लोकांना पटलेले नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. 

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळे महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असे वाटत नाही. शिंदे गटालील आमदारांचे पुढच्या टर्मला निवडूण येणे कठीण आहे, असे जयंत पाटील म्हणाले. तत्पूर्वी काही दिवसांआधी मध्यावधी निवडणुका लागतील का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सरकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत, असे शरद पवार म्हणाले होते. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस