शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 18:15 IST

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून, शिवसेनेतील बंडखोर आमदारांना टार्गेट करून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याची नवी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे प्लॅनिंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मदत करण्यासाठी आहे की, डाव उलटवण्यासाठी आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे सांगितले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह मोठे बंड पुकारले. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर अनेक आरोप करण्यात आले. यातील मुख्य रोख राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर शिवसेनेचे खच्चीकरण केल्याचा दावा करण्यात आला होता. यातच आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून स्वपक्षाचा फायदा करून घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी खास रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.

बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आदेश 

शिवसेना सोडल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात बंडखोर आमदारांविषयी काहीशी नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. याचाच फायदा उठवत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. जनतेच्या मनात पक्षांतराबद्दल जागृती निर्माण करा. यामुळे जनतेत त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण होईल व जनता त्यांना स्वीकारणार नाही. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी या गोष्टीचा फायदा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षांतर करणे लोकांना आवडत नाही, त्यातच काही ‘आमिष’ घेऊन गेले असतील तर जनतेला ते अजिबात पसंत पडत नाही, त्याविरुद्ध जनतेत चीड निर्माण होते. त्यामुळे शिवसेनेतून पक्षांतर करून काही आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी पक्षांतर कशासाठी केले आहे, त्याचीही सुरु चर्चा आहे. हाच मुद्दा धरुन बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणात '५० खोके, एकदम ओके' या सत्ताधाऱ्यांविरोधातील महाविकास आघाडीच्या घोषणेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता याच घोषणेचे 'टी शर्ट' वाटून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून प्रचार करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे