शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राज्यात पक्ष विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचलली पावले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:03 IST

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 16, शिवसेनेला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पक्षविस्तारासाठी पावले उचलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई - राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद विभागून मिळू शकत होते. मात्र राष्ट्रवादीने तस न करता सर्वाधिक मंत्रीपदं घेतली आहेत. याचा लाभ राष्ट्रवादीला पक्ष विस्तारासाठी होणार हे नक्की. 

सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यासाठी वाव असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद डावलले आहे. आघाडीच्या काळात राष्ट्रवादीला विधानसभेला काँग्रेसच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल हे निश्चित मानले जात होते. मात्र त्यावेळी देखील राष्ट्रवादीने अधिकची मंत्रीपदं घेऊन वाटाघाटी केली होती. त्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. 

आता पुन्हा एकदा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळत असताना शरद पवारांनीउद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच आग्रह केला. त्यामुळे नाईलाजाने उद्धव य़ांना मुख्यमंत्री व्हावे लागले. या संदर्भात विचारले असता, पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होते. तसेच आघाडीच्या काळात राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेण्यामागे पक्षविस्तार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्रीपद न घेता अधिकची मंत्रीपदं घेण्यावर त्यावेळी आमचा भर होता. जेणेकरून राज्यातील विविध भागात पक्षविस्तारासाठी मदत होणार होती. आता महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही पवार यांनी अडीच वर्षांसाठी मिळत असलेले मुख्यमंत्रीपद नाकारले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 16, शिवसेनेला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पक्षविस्तारासाठी पावले उचलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.