शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी तेव्हा ‘त्या’ सूचना दिल्या नव्हत्या”; दिलीप वळसे-पाटलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:15 IST

Maharashtra Political Crisis: खासदार श्रीकांत शिंदेंनी पत्र लिहून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा मागितली होती, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवली नसल्यावरून बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे. 

नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही तत्कालीन राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवायला नकार दिला होता, असा गंभीर आरोप शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला होता. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी फोन करून तुम्ही असे आदेश देऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांना कोणतीही सुरक्षा देऊ नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याचा मोठा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावर आता तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती

दिलीप वळसे-पाटील यांनी शिंदे गटाच्या आमदारांचे आरोप फेटाळू लावले आणि यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा मागितली होती. पण एकनाथ शिंदेंकडून स्वतः कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नव्हती. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भात सूचना ठाणे पोलिसांना, पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही चर्चा अनावश्यक चर्चा आहे. अशा प्रकारची पत्रे सार्वजनिक जीवनात येत असतात. पोलीस विभाग त्याचे विश्लेषण करुन त्याच्यावर काय कारवाई करायची हे ठरवत असतात, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे