शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी तेव्हा ‘त्या’ सूचना दिल्या नव्हत्या”; दिलीप वळसे-पाटलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:15 IST

Maharashtra Political Crisis: खासदार श्रीकांत शिंदेंनी पत्र लिहून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा मागितली होती, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवली नसल्यावरून बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे. 

नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही तत्कालीन राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवायला नकार दिला होता, असा गंभीर आरोप शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला होता. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी फोन करून तुम्ही असे आदेश देऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांना कोणतीही सुरक्षा देऊ नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याचा मोठा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावर आता तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती

दिलीप वळसे-पाटील यांनी शिंदे गटाच्या आमदारांचे आरोप फेटाळू लावले आणि यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा मागितली होती. पण एकनाथ शिंदेंकडून स्वतः कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नव्हती. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भात सूचना ठाणे पोलिसांना, पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही चर्चा अनावश्यक चर्चा आहे. अशा प्रकारची पत्रे सार्वजनिक जीवनात येत असतात. पोलीस विभाग त्याचे विश्लेषण करुन त्याच्यावर काय कारवाई करायची हे ठरवत असतात, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे