शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ईव्हीएममध्ये नव्हे, तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 4:11 PM

शरद पवारांनी व्यक्त केला संशय

मुंबई: ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या 20 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या घोटाळ्याच्या खोलात जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले. 'मतदार ज्या ठिकाणी मतदान करतात, त्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काहीच घोटाळा नाही. पण ज्यावेळी ईव्हीएम निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती जाते. त्यांच्याकडून मतमोजणी केली जाते, त्यावेळी काहीतरी गडबड होते. आम्ही काही तंत्रज्ञांशी आणि विरोधकांशी चर्चा करून या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत,' असं शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. मतदान आणि मतमोजणीतील घोटाळा लोकांच्या लक्षात आल्यास लोक कायदा हातात घेतील, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. 'आपण दिलेलं मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नसल्याचं लोकांच्या लक्षात आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. लोक आता शांत राहतील. पण भविष्यात असं घडल्यास माणसं कायदा हातात घेतील आणि आम्ही ते होऊ देणार नाही,' असं शरद पवार यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पवारांनी ईव्हीएमवर भाष्य करताना बारामतीचा उल्लेख केला होता. बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं म्हणत शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला होता. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVVPATव्हीव्हीपीएटीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९