शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:42 IST

सत्ताधाऱ्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाल्याचंही शरद पवार म्हणाले.

नाशिक :केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावरील लढाईसाठी मैदानात उतरले आहेत. कांदा निर्यातबंदी उठवण्यात यावी, या मागणीसाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून केंद्र सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. तसंच आपण ताकद दाखवल्यामुळे आता दिल्लीचीह झोप उडाली असेल, असं पवार यांनी म्हटलं. 

रास्तारोको आंदोलनात कांदा प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे. मात्र सरकारच्या धोरणामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही. कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांदाच्या निर्यातीवरील बंदी उठवलीच पाहिजे. रास्तारोको आंदोलन करून लोकांना त्रास देण्याची आम्हाला काही हौस नाही. पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आज इथं आपण आलो, रस्त्यावर बसलो, माझी खात्री आहे की दिल्लीचीही झोप उडाली असेल. आज सकाळपासून मी टीव्हीवर बघत आहे की राज्यातील विविध नेते बोलत आहेत की आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करणार, हा निर्णय बदलणार, असं म्हणतायत. याआधी हा प्रश्न निर्माण झाल्यापासून कोणाला आठवण आली नाही. मात्र त्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाली. तरीही एवढ्यावरच समाधान मानून आपल्याला चालणार नाही, लक्ष ठेवावं लागेल. कारण सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणारे नाहीत," अशा शब्दांत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

'कांदा महाग वाटत असेल तर खाऊ नका' 

कांदा महाग झाल्याची ओरड करणाऱ्यांना टोला लगावताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "कांदा महाग झाला आहे, अशी चर्चा आज सुरू आहे. कांदा खाणंही कठीण झालं आहे, असं म्हटलं जातं. कठीण झालंय तर खाऊ नका. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळाले पाहिजेत. पण सरकारने लगेच निर्णय घेतला आणि निर्यातीवर कर लावला. आता तर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्या," अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...

दरम्यान, "आज येताना मला काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की,  २६ तारखेला आमच्याकडे गारपीट झाली. या गारपिटीमध्ये द्राक्षबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र सरकारकडून मदत देण्यात आलेली नाही," असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारonionकांदाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार