शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या ताकदीमुळे दिल्लीचीही झोप उडाली असेल; कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:42 IST

सत्ताधाऱ्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाल्याचंही शरद पवार म्हणाले.

नाशिक :केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावरील लढाईसाठी मैदानात उतरले आहेत. कांदा निर्यातबंदी उठवण्यात यावी, या मागणीसाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून केंद्र सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. तसंच आपण ताकद दाखवल्यामुळे आता दिल्लीचीह झोप उडाली असेल, असं पवार यांनी म्हटलं. 

रास्तारोको आंदोलनात कांदा प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे. मात्र सरकारच्या धोरणामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही. कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांदाच्या निर्यातीवरील बंदी उठवलीच पाहिजे. रास्तारोको आंदोलन करून लोकांना त्रास देण्याची आम्हाला काही हौस नाही. पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आज इथं आपण आलो, रस्त्यावर बसलो, माझी खात्री आहे की दिल्लीचीही झोप उडाली असेल. आज सकाळपासून मी टीव्हीवर बघत आहे की राज्यातील विविध नेते बोलत आहेत की आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करणार, हा निर्णय बदलणार, असं म्हणतायत. याआधी हा प्रश्न निर्माण झाल्यापासून कोणाला आठवण आली नाही. मात्र त्यांना जेव्हा कळलं की चांदवडमध्ये सर्व लोक एकत्र जमून आपली शक्ती दाखवणार आहेत, तेव्हाच सरकार दरबारी हालचाल सुरू झाली. तरीही एवढ्यावरच समाधान मानून आपल्याला चालणार नाही, लक्ष ठेवावं लागेल. कारण सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणारे नाहीत," अशा शब्दांत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

'कांदा महाग वाटत असेल तर खाऊ नका' 

कांदा महाग झाल्याची ओरड करणाऱ्यांना टोला लगावताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "कांदा महाग झाला आहे, अशी चर्चा आज सुरू आहे. कांदा खाणंही कठीण झालं आहे, असं म्हटलं जातं. कठीण झालंय तर खाऊ नका. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळाले पाहिजेत. पण सरकारने लगेच निर्णय घेतला आणि निर्यातीवर कर लावला. आता तर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्या," अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...

दरम्यान, "आज येताना मला काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की,  २६ तारखेला आमच्याकडे गारपीट झाली. या गारपिटीमध्ये द्राक्षबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र सरकारकडून मदत देण्यात आलेली नाही," असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारonionकांदाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार