शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर महायुती सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही”: अमोल मिटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:46 IST

NCP AP Group Amol Mitkari News: अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच शोभते. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवारांकडे अर्थखाते द्यायला हवे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

NCP AP Group Amol Mitkari News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करत असतानाच अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे.

दिल्लीत अजित पवारांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसह शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना, शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही पूर्णत: कौटुंबिक होती. त्याचे कोणतेही राजकीय अन्ववयार्थ काढू नये, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर मग या सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही

संपूर्ण महाराष्ट्राने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पाहिले की, ज्या योजना महाराष्ट्रात आल्या, त्यात लाडकी बहीणपासून ते शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीपर्यंतच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. राज्यावर आर्थिक बोजा पडणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, यासाठी सर्व प्रयत्न तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवार यांच्याकडेच अर्थ खाते असले पाहिजे. महायुतीमध्ये अर्थमंत्री म्हणून अजितदादा हेच शोभतात. अर्थमंत्री खात्यासाठी वाटाघाटी होत असतील आणि जर आम्हाला समजले की भाजपाकडेच गृह आणि अर्थ खाते राहत असेल, तर गृह खाते भाजपाला शोभते, ते त्यांनी ठेवावे आणि अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला शोभते. त्यामुळे अजित पवारांकडेच अर्थमंत्रीपद असावे, अशी आमची इच्छा आहे. अन्यथा त्या महायुतीला काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, परभणीतील या प्रकरणानंतर फक्त दलित समाज, आंबेडकरी जनता रस्त्यावर आली. इतर समाजालाही हक्क बाबासाहेबांच्या घटनेने दिले आहेत. मग इतर समाज शांत का?, त्यांनी लोकशाही मार्गाने निषेध का नोंदवला नाही? अशी विचारणा मिटकरी यांनी केली. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीAjit Pawarअजित पवार