शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

“अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर महायुती सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही”: अमोल मिटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:46 IST

NCP AP Group Amol Mitkari News: अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच शोभते. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवारांकडे अर्थखाते द्यायला हवे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

NCP AP Group Amol Mitkari News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करत असतानाच अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे.

दिल्लीत अजित पवारांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसह शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना, शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही पूर्णत: कौटुंबिक होती. त्याचे कोणतेही राजकीय अन्ववयार्थ काढू नये, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर मग या सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही

संपूर्ण महाराष्ट्राने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पाहिले की, ज्या योजना महाराष्ट्रात आल्या, त्यात लाडकी बहीणपासून ते शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीपर्यंतच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. राज्यावर आर्थिक बोजा पडणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, यासाठी सर्व प्रयत्न तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवार यांच्याकडेच अर्थ खाते असले पाहिजे. महायुतीमध्ये अर्थमंत्री म्हणून अजितदादा हेच शोभतात. अर्थमंत्री खात्यासाठी वाटाघाटी होत असतील आणि जर आम्हाला समजले की भाजपाकडेच गृह आणि अर्थ खाते राहत असेल, तर गृह खाते भाजपाला शोभते, ते त्यांनी ठेवावे आणि अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला शोभते. त्यामुळे अजित पवारांकडेच अर्थमंत्रीपद असावे, अशी आमची इच्छा आहे. अन्यथा त्या महायुतीला काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, परभणीतील या प्रकरणानंतर फक्त दलित समाज, आंबेडकरी जनता रस्त्यावर आली. इतर समाजालाही हक्क बाबासाहेबांच्या घटनेने दिले आहेत. मग इतर समाज शांत का?, त्यांनी लोकशाही मार्गाने निषेध का नोंदवला नाही? अशी विचारणा मिटकरी यांनी केली. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीAjit Pawarअजित पवार