शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

“अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर महायुती सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही”: अमोल मिटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:46 IST

NCP AP Group Amol Mitkari News: अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच शोभते. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवारांकडे अर्थखाते द्यायला हवे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

NCP AP Group Amol Mitkari News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करत असतानाच अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे.

दिल्लीत अजित पवारांनी सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसह शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना, शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही पूर्णत: कौटुंबिक होती. त्याचे कोणतेही राजकीय अन्ववयार्थ काढू नये, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद नसेल, तर मग या सरकारलाही ‘अर्थ’ राहणार नाही

संपूर्ण महाराष्ट्राने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पाहिले की, ज्या योजना महाराष्ट्रात आल्या, त्यात लाडकी बहीणपासून ते शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीपर्यंतच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. राज्यावर आर्थिक बोजा पडणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, यासाठी सर्व प्रयत्न तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. राज्याला आर्थिक शिस्त लावायची असेल, तर अजित पवार यांच्याकडेच अर्थ खाते असले पाहिजे. महायुतीमध्ये अर्थमंत्री म्हणून अजितदादा हेच शोभतात. अर्थमंत्री खात्यासाठी वाटाघाटी होत असतील आणि जर आम्हाला समजले की भाजपाकडेच गृह आणि अर्थ खाते राहत असेल, तर गृह खाते भाजपाला शोभते, ते त्यांनी ठेवावे आणि अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला शोभते. त्यामुळे अजित पवारांकडेच अर्थमंत्रीपद असावे, अशी आमची इच्छा आहे. अन्यथा त्या महायुतीला काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, परभणीतील या प्रकरणानंतर फक्त दलित समाज, आंबेडकरी जनता रस्त्यावर आली. इतर समाजालाही हक्क बाबासाहेबांच्या घटनेने दिले आहेत. मग इतर समाज शांत का?, त्यांनी लोकशाही मार्गाने निषेध का नोंदवला नाही? अशी विचारणा मिटकरी यांनी केली. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीAjit Pawarअजित पवार