शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Political Crisis: “नक्कीच काहीतरी गडबड आहे”; बहुमत चाचणीच्या आदेशावरून राष्ट्रवादीचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:37 IST

बहुमत चाचणी होणार नाही, तोवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करु नये, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या ठाकरे (Maha Vikas Aghadi Govt) सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावरून राज्यपालांवर टीका केली आहे. नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी घेतली आहे. 

महामहीम राज्यपाल महोदय दडपशाही  खाली आहेत का हे सुद्धा तपासले पाहिजे. इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजून पर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणी चा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे, असे एक ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच आणखी काही केलेल्या ट्विटमध्येही या सर्व राजकीय घडामोडींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रसारमाध्यमांना दिला इशारा

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून दिल्या जात आहे. यावर आक्षेप घेत, काही वृत्तवाहिन्या मुख्यमंत्री राजीनामा देतील असे चार दिवसांपासून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना प्रामाणिकपणे व नम्रतेने सांगतो जोपर्यंत बहुमत चाचणी होणार नाही तोवर राजीनाम्या बाबत भाष्य करु नये, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच राज्यपालांचे वर्तन घटनाविरोधी असल्याचा दावाही केला आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाला विश्वासात घेतल्या शिवाय राज्यपाल बहुमत चाचणी प्रक्रिया घेतील तर ते घटनाबाह्य ठरेल, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. याचाच आधार घेऊन राज्यपालांचे अनेक वर्तन घटना विरोधी, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस