शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“सावधान! देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:56 IST

सत्तेसाठी हपापावे| वाटेल तैसे पाप करावे|| जनशक्तीस पायी तुडवावे| ऐसे चाले स्वार्थासाठी||, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीला पोहोचलेला सत्तासंघर्ष आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा यानंतर आता एकनाश शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन करण्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच अमोल मिटकरी यांनी ट्विट करत यावर काही प्रश्न उपस्थित केले. सत्तेपायी हपापलेल्या स्वार्थी लोकांसाठी तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत  लिहून ठेवलं होतं, "सत्तेसाठी हपापावे| वाटेल तैसे पाप करावे|| जनशक्तीस पायी तुडवावे| ऐसे चाले स्वार्थासाठी||" महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत!सावधान !!, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. 

मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल, अशी शंका अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे. 

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना, पायाभूत सुविधांच्या कामांना स्थगिती, विकास योजना नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचाराकरिता जेलमध्ये जाणं अत्यंत आश्चर्याची, खेदजनक गोष्ट होती. एकीकडे बाळासाहेबांनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे, त्याच्याशी संबंधित असलेला म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, तरी मंत्रिपदावरून काढण्यात आले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यावेळी हे सरकार गेले, तेव्हा महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती. हे सरकार कधीही पडेल, असे सांगायचो. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, पर्यायी सरकार देऊ, असे म्हणायचो. शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजपचा विधिमंडळ गट आणि १६ अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार असा मोठा गट सोबत आलेला आहे. अजून काही लोक येत आहेत. यांचे पत्र राज्यपालांना दिले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAmol Mitkariअमोल मिटकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी