शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

“सावधान! देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:56 IST

सत्तेसाठी हपापावे| वाटेल तैसे पाप करावे|| जनशक्तीस पायी तुडवावे| ऐसे चाले स्वार्थासाठी||, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीला पोहोचलेला सत्तासंघर्ष आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा यानंतर आता एकनाश शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन करण्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच अमोल मिटकरी यांनी ट्विट करत यावर काही प्रश्न उपस्थित केले. सत्तेपायी हपापलेल्या स्वार्थी लोकांसाठी तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत  लिहून ठेवलं होतं, "सत्तेसाठी हपापावे| वाटेल तैसे पाप करावे|| जनशक्तीस पायी तुडवावे| ऐसे चाले स्वार्थासाठी||" महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत!सावधान !!, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. 

मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल, अशी शंका अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे. 

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना, पायाभूत सुविधांच्या कामांना स्थगिती, विकास योजना नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचाराकरिता जेलमध्ये जाणं अत्यंत आश्चर्याची, खेदजनक गोष्ट होती. एकीकडे बाळासाहेबांनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे, त्याच्याशी संबंधित असलेला म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, तरी मंत्रिपदावरून काढण्यात आले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यावेळी हे सरकार गेले, तेव्हा महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती. हे सरकार कधीही पडेल, असे सांगायचो. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, पर्यायी सरकार देऊ, असे म्हणायचो. शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजपचा विधिमंडळ गट आणि १६ अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार असा मोठा गट सोबत आलेला आहे. अजून काही लोक येत आहेत. यांचे पत्र राज्यपालांना दिले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAmol Mitkariअमोल मिटकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी