शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 19:48 IST

NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: गेल्या काही दिवसांपासून बैठकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच ठिकाणी आल्याचे पाहायला मिळाले. तसेच आजही शरद पवार हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि उद्याही कायम राहतील, असे विधान अजित पवारांनी एका सभेत बोलताना केले होते. यावरून अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यातच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

सुनील तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यानंतर सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनील तटकरे यांना रायगड पालकमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता, निरपेक्ष बुद्धीने परमेश्वराच्या चरणी लीन झालो की, त्यातून एक सात्विक समाधान मिळत असते. माझ्या मनात कोणताही विषय नाही. अवघ्या महाराष्ट्राला, बळीराजाला सुगीचे दिवस यावेत, हीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली, असे तटकरे यांनी सांगितले.

अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का?

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का, अशा आशयाचा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, पांडुरंगाकडे अशा प्रकारची मागणी करण्याचे काही कारण नाही. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ असे आम्ही सर्वांनी मिळून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली उद्याच्या भविष्यासाठी राजकीयदृष्ट्या काम करणार आहोत. यात आम्हाला यश मिळत राहो, असे सुनील तटकरे म्हणाले.

दरम्यान, कुटुंबासमवेत श्री क्षेत्र तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या तीन पवित्र तीर्थस्थळांचे दर्शन घेतले. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, अक्कलकोट निवासी श्री स्वामींच्या कृपेने आणि विठ्ठल-रखुमाईंच्या चरणस्पर्शाने मन प्रसन्न झाले. एका दिवसात या तीन पवित्र तीर्थस्थळांची एक अविस्मरणीय यात्रा झाली. या यात्रेतून आध्यात्मिक शांती आणि कुटुंबियांसोबत अमूल्य क्षण मिळाले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPandharpurपंढरपूर