शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

“खरी राष्ट्रवादी आमचीच, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत”: अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:46 IST

NCP Ajit Pawar Group Hasan Mushrif: खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

NCP Ajit Pawar Group Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी आपापली बाजू भक्कम असल्याचे सांगत आयोगाकडे कागदपत्रे, पुरावे जमा केले आहेत. शरद पवार गटाने ८-९ हजार प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. अजित पवार गटापेक्षा जास्त कागदपत्रे सादर केल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. यावर खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचीच असून, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिले असल्याचा दावा अजित पवार गटातील एका नेत्याने केला आहे.

अजित पवारांनी २ जुलै रोजी ८ सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. अजित पवार गटासोबत ४३ ते ४५ आमदार असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कुठल्याही गटाने अशी अधिकृत माहिती दिलेली नाही. यासंदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. पहिल्या दिवशी झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार उपस्थित राहिले होते.

निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत

आमच्याकडे असलेला पक्ष खरा पक्ष असून त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. ट्रकभर पुरावे आयोगाकडे सुपूर्द केल्याने योग्य तोच निर्णय लागेल, अशी अपेक्षा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, मंत्रिमंडळ बैठकीत गँगवॉर झाल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याला हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी केलेला दावा खोटा आहे. असा कोणताही वाद झाला नाही. ही चुकीची माहिती आहे. संजय राऊत हे सिद्ध करू शकले की अंगावार धावून वगैरे गेले, तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले आहे. 

कुणीही गैरसमज करुन घेऊ नये

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. त्यामुळेच आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. ज्यांना कुणबी दाखले आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण द्यावे, असे भुजबळ बोलले आहेत. त्यामुळे कोणताही वाद नाही. कुणीही गैरसमज करुन घेऊ नये, असे हसन मुश्रीफांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही भाजपवाले त्यांना जुमानत नाहीत. कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला होता.

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग