शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

आम्ही नवाब मलिकांसोबत; फडणवीसांच्या पत्रानंतरही अमोल मिटकरींनी डिवचलं, वाद पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:03 IST

फडणवीसांच्या पत्रानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट नवाब मलिकांना दूर ठेवणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीने. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले नवाब मलिक सध्या वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत. अनेक दिवसांनंतर काल ते सभागृहात गेले आणि थेट सत्ताधारी बाकांवर बसले. भाजपने मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप केलेले असताना नवाब मलिक हे महायुतीसोबत दिसल्याने विरोधकांनी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं. दिवसभर टीकेचा भडीमार झाल्यानंतर संध्याकाळी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांचा महायुतीत समावेश करू नये, अशी विनंती केली. त्यामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट नवाब मलिकांना दूर ठेवणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज अजित पवार गटाचे विधानपरिषद आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या पत्राबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही मलिक यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

"नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत आहे," अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. एकीकडे नवाब मलिक यांना दूर ठेवण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली असताना मिटकरी यांनी हे वक्तव्य केल्याने अजित पवार गटाकडून भाजपच्या भूमिकेला आव्हान दिलं जात आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

फडणवीसांच्या पत्राबद्दल नाराजी

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केल्याने अजित पवार गट नाराज झाला आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी पत्र सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. मी त्याबद्दल कालच खेद व्यक्त केला आहे. सध्या व्हॉट्सअॅप आणि फोनचा जमाना आहे. यावरही बोलता आलं असतं, खासगीतही बोलता आलं असतं," असं मिटकरींनी म्हटलं आहे.

नवाब मलिक प्रकरणाबद्दल पुढेल बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, "सभागृहात कोणी कुठे बसायचं, याबाबतचा निर्णय सरकारच घेत असतं. नवाब मलिक जर सत्ताधारी बाकावर बसले होते, तर त्यांची तिथं बसण्याची व्यवस्था नक्की कोणी केली होती, याच्या तळाशीही पत्रकार बांधवांनी गेलं पाहिजे. याबाबत विधानसभा अध्यक्ष अधिकृत माहिती देऊ शकतील. आमच्याकडे राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचं प्रतिज्ञापत्र आहेत. नवाब मलिक यांचंही प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहे. नवाब मलिक हे पक्षाचे नेते आहते आणि पक्षही त्यांच्यासोबत आहे."

काय होतं फडणवीसांचं पत्र?

'सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा,' अशा कॅप्शनसह देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. "सध्या नवाब मलिक हे केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे," अशी भूमिका पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रावर स्वत: अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा