शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

"असेल धमक तर समोरासमोर या ना..."; मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनावर अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 11:28 IST

राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन हाती घेतले होते. 

बारामती - मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. या घटनेचा निषेध करत मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे मारो आंदोलन केले. त्यात मुंबईच्या गेट ऑफ इंडिया इथं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. यावरूनच अजित पवार चांगले संतापले आहेत. तुमच्यात धमक असेल तर समोरासमोर या ना...हा कसला रडीचा डाव खेळता असा टोला अजितदादांनी उद्धव ठाकरेंसहमहाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

बारामतीत जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, काहींनी जोडे मारो आंदोलन केले त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि मी अशा फोटोला चप्पलेने मारले. अरे असं कशाला जोडे मारता, असेल धमक तर या ना समोरासमोर, मग बघतो ना. हा कसला रडीचा डाव? एखाद्या महापुरुषाचा पुतळा आपल्या काळात उभारलेला असताना तो पडावा असं कुठल्या तरी सरकारला वाटेल का? कुणालाच वाटणार नाही, पण त्यात राजकारण, वेगवेगळ्या टीकाटिप्पणी, आम्हीही मूक आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत याचा तपास करावा अशी मागणी केली असं त्यांनी सांगितले. 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यापूर्वी बसवलेला त्याचे नुकसान झाले. जे घडायला नको ते घडले. ही दुर्दैवी घटना होता कामा नये. आमच्याही मनाला लागलं. अहमदपूर येथे सभेत मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागितली. या घटनेत ज्याची चूक असेल त्याला शोधून काढू. कोणाची तरी चूक असेल त्याला शोधायचे, त्याला शासन करायचे आणि पुन्हा तिथे महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारायचे. मी स्वत: तिथे गेलो. देखावा न करता तिथल्या बांधकामाची बारकाईनं पाहणी केली. राजकारण करू नका असंही अजित पवारांनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभेत संविधान बदलणार, घटना बदलणार असं कुणी सांगितले ते लोकांना खरे वाटले. सगळ्या जातीजमातीतील लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आम्ही यात कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही मला ५ वर्ष निवडून दिले. मी ५ वर्षात काय केले याचे पुस्तक तुम्हाला देणार आहे. जर आपण काय केले हे सांगितले नाही तर लोक विसरून जातात. आज बारामतीत ज्या सुविधा येतायेत त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. प्रशासनावर तुमची पकड असावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. मी ३०-३५ वर्ष राजकीय सभा घेतोय पण यावेळी जाईल तिथे प्रचंड गर्दी होतेय. महिलांची संख्या अधिक आहे. भावाच्या नात्याने सांगतो, बहिणींना कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज